शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कर्जमाफी करूनही मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्यासमोर मोठे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 15:57 IST

मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत काँग्रेसने दिलासा दिलेला असला तरीही नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत काँग्रेसने दिलासा दिलेला असला तरीही नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. शेतीसाठी लागणारे खतच पुरेसे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या सशस्त्र पोलिस बंदोबस्तात खताचा पुरवठा करावा लागत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कमलनाथ यांना धोक्याची कल्पना दिली असून लवकरात लवकर युरियाची व्यवस्था न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा इशारा पत्राद्वारे दिला आहे.

मध्य प्रदेशमध्ये खताच्या टंचाईची स्थिती 4 ऑक्टोबरलाच समोर आली होती. मात्र, विधानसभा निवडणुका असल्याने शिवराज सिंह यांच्या सरकारने याकडे कानाडोळा केला होता. होशंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 4 ऑक्टोबरलाच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सावध केले होते. आतापर्यंत पाच जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रे लिहीली असून 27 हजार मेट्रीक टन युरियाची मागणी केली आहे. मात्र, केवळ 6 केंद्रांतूनच बंदुकधारी पोलिसांच्या बंदोबस्तात युरियाचे वितरण करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी कमलनाथ यांनाही या परिस्थितीच कल्पना देऊन भारतीय किसान संघ याविरोधात आंदोलन छेडण्याची शक्यता वर्तविली आहे, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याबाबत राज्याचे मुख्य कृषी सचिव यांच्याकडे उत्तर मागितले आहे. 

गहू, चना, मसूरसह अन्य रब्बी हंगामातील पिकांसाठी वातावरण अनुकुल झाल्याने मध्य प्रदेशमध्ये युरियाची मागणी वाढली आहे. जवळपास डझनभर जिल्ह्यांमध्ये मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना वितरण केंद्रांवर रांग लावावी लागत आहे. तीन लाख मेट्रीक टन ऐवजी केवळ 1.34 लाख मेट्रीक टन युरियाच मध्य प्रदेशमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यामुळे होशंगाबाद आणि रायसेनमध्ये शेतकऱ्यांनी रास्तारोको करत आंदोलन केले होते.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरी