शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अजबच! 'या' राज्यातील जनतेचा कौल भाजपला; पण मुख्यमंत्रिपदी हवाय काँग्रेस नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 08:56 IST

काँग्रेस-भाजपमध्ये अटीतटीची लढत; मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्याला सर्वाधिक पसंती

देहरादून: पुढील वर्षी ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पुढील वर्षी होणारी निवडणूक २०२४ मधील लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी-सी व्होटरनं एक सर्वेक्षण केलं आहे. त्याआधारे मतदारांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. गेल्या वर्षभरात राज्यानं तीन मुख्यमंत्री पाहिले आहेत. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या ७० जागा आहेत. बहुमतासाठी ३६ जागा जिंकण्याची गरज आहे. एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, भाजपला ३६ ते ४० जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ३० ते ३४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. आम आदमी पक्षाला ० ते २ जागा मिळू शकतात.

उत्तराखंडमध्ये भाजपला ४१ टक्के मतदान होईल असा अंदाज आहे. तर काँग्रेसला ३६ टक्के मतं मिळू शकतात. याशिवाय आपला १२ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. अन्य पक्ष आणि उमेदवारांना ११ टक्के मतं मिळू शकतील.

मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला पसंती?गेल्या वर्षभरात उत्तराखंडनं तीन मुख्यमंत्री पाहिले. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप नेतृत्त्वानं सरकारचा चेहरा बदलला. विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनीच पदावर कायम राहावं, असं २८ टक्के जणांना वाटतं. तर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी मुख्यमंत्री व्हावं, असं ३१ टक्के जनतेला वाटतं. तर अनिल बलुनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा जावी, असं १८ टक्के लोकांना वाटतं.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस