शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

Deoghar Ropeway Accident: रोपवे रेस्क्यू ऑपरेशनवेळी मोठा अपघात; २ हजार फुटांवरून लष्करी हेलिकॉप्टरमधून युवक पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 19:21 IST

देवघर जिल्ह्यातील त्रिकुट डोंगरावर रोपवेच्या दुर्घटनेनंतर ट्रॉलीमध्ये लटकलेल्या ४८ पैकी २६ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

नवी दिल्ली – झारखंडच्या देवघर रोपवे येथे रविवारी झालेल्या दुर्घटनेत अनेक लोकं रोपवे अडकली होती. १८ तासांपासून या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम केले जात आहे. लष्कराच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले आहे. मात्र याच रेस्क्यू ऑपरेशनवेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. रेस्क्यूवेळी एका युवक लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून खाली पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.

बचावकार्य सुरू

देवघर जिल्ह्यातील त्रिकुट डोंगरावर रोपवेच्या दुर्घटनेनंतर ट्रॉलीमध्ये लटकलेल्या ४८ पैकी २६ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. वायुसेना, आयटीबीपी, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाचे पथक संयुक्तपणे बचाव कार्यात गुंतले आहेत. हेलिकॉप्टरला लटकलेले लष्कराचे जवान दोरीच्या साहाय्याने एकामागून एक लोकांना ट्रॉलीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एनडीआरएफचे निरीक्षक ओमप्रकाश यांनी सांगितले की, २२ लोक अजूनही ६ रोपवेमध्ये अडकले आहेत, ज्यांना रात्रीपर्यंत बाहेर काढले जाईल.

रघुवर दास यांचा सोरेन सरकारवर निशाणा

देवघर रोपवे दुर्घटनेवरून झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारवर निशाणा साधला आहे. ही घटना सरकारचे अपयश असल्याचे दास म्हणाले. रविवारी जेव्हा अपघात झाला तेव्हाच सरकारनं दखल घ्यायला हवी होती.मात्र ही राजकारण करण्याची वेळ नाही असं सांगत झारखंडचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री बन्ना गुप्ता यांनी त्यांना उत्तर दिले आहे.

तसेच देवघर प्रकरणात सरकारने मृतांच्या नातेवाईकांना एक कोटींची भरपाई द्यावी. सरकारच्या अपयशामुळे २ मृत्यू झाले आहेत. तर ४८ पर्यटक रात्रभर भुकेने तहानलेल्या हवेत लटकत होते, ज्या जिल्ह्यातून पर्यटन मंत्री येतात ते घटनेला १८ तास उलटूनही घटनास्थळी पोहोचले नाहीत. हे दुर्दैवी आहे. एनडीआरएफ आणि सीआरपीएफ जवानांवर विश्वास आहे असं झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास म्हणाले.

कसा झाला अपघात?

पर्यटकांच्या माहितीनुसार, रोपवे सुरू असताना वरून खाली येणाऱ्या ट्रॉलीची धडक खालून वर जाणाऱ्या ट्रॉलीला दिली. त्यानंतर इतर ट्रॉली जागेवरून निसटल्या तेव्हा ही दुर्घटना आहे. रोपवे तारांच्या विविध भागात जवळपास १२ ट्रॉली अडकल्या आहेत. काही ट्रॉलीतून अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली. मात्र खूप उंचावर असल्याने अद्याप याठिकाणी बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम बोलवण्यात आली. मात्र उंची जास्त असल्याने त्यांनाही रेस्क्यू करताना अडथळा निर्माण झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी लष्कराने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले.