शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

Deoghar Ropeway Accident: रोपवे रेस्क्यू ऑपरेशनवेळी मोठा अपघात; २ हजार फुटांवरून लष्करी हेलिकॉप्टरमधून युवक पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 19:21 IST

देवघर जिल्ह्यातील त्रिकुट डोंगरावर रोपवेच्या दुर्घटनेनंतर ट्रॉलीमध्ये लटकलेल्या ४८ पैकी २६ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

नवी दिल्ली – झारखंडच्या देवघर रोपवे येथे रविवारी झालेल्या दुर्घटनेत अनेक लोकं रोपवे अडकली होती. १८ तासांपासून या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम केले जात आहे. लष्कराच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले आहे. मात्र याच रेस्क्यू ऑपरेशनवेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. रेस्क्यूवेळी एका युवक लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून खाली पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.

बचावकार्य सुरू

देवघर जिल्ह्यातील त्रिकुट डोंगरावर रोपवेच्या दुर्घटनेनंतर ट्रॉलीमध्ये लटकलेल्या ४८ पैकी २६ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. वायुसेना, आयटीबीपी, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाचे पथक संयुक्तपणे बचाव कार्यात गुंतले आहेत. हेलिकॉप्टरला लटकलेले लष्कराचे जवान दोरीच्या साहाय्याने एकामागून एक लोकांना ट्रॉलीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एनडीआरएफचे निरीक्षक ओमप्रकाश यांनी सांगितले की, २२ लोक अजूनही ६ रोपवेमध्ये अडकले आहेत, ज्यांना रात्रीपर्यंत बाहेर काढले जाईल.

रघुवर दास यांचा सोरेन सरकारवर निशाणा

देवघर रोपवे दुर्घटनेवरून झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारवर निशाणा साधला आहे. ही घटना सरकारचे अपयश असल्याचे दास म्हणाले. रविवारी जेव्हा अपघात झाला तेव्हाच सरकारनं दखल घ्यायला हवी होती.मात्र ही राजकारण करण्याची वेळ नाही असं सांगत झारखंडचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री बन्ना गुप्ता यांनी त्यांना उत्तर दिले आहे.

तसेच देवघर प्रकरणात सरकारने मृतांच्या नातेवाईकांना एक कोटींची भरपाई द्यावी. सरकारच्या अपयशामुळे २ मृत्यू झाले आहेत. तर ४८ पर्यटक रात्रभर भुकेने तहानलेल्या हवेत लटकत होते, ज्या जिल्ह्यातून पर्यटन मंत्री येतात ते घटनेला १८ तास उलटूनही घटनास्थळी पोहोचले नाहीत. हे दुर्दैवी आहे. एनडीआरएफ आणि सीआरपीएफ जवानांवर विश्वास आहे असं झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास म्हणाले.

कसा झाला अपघात?

पर्यटकांच्या माहितीनुसार, रोपवे सुरू असताना वरून खाली येणाऱ्या ट्रॉलीची धडक खालून वर जाणाऱ्या ट्रॉलीला दिली. त्यानंतर इतर ट्रॉली जागेवरून निसटल्या तेव्हा ही दुर्घटना आहे. रोपवे तारांच्या विविध भागात जवळपास १२ ट्रॉली अडकल्या आहेत. काही ट्रॉलीतून अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली. मात्र खूप उंचावर असल्याने अद्याप याठिकाणी बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम बोलवण्यात आली. मात्र उंची जास्त असल्याने त्यांनाही रेस्क्यू करताना अडथळा निर्माण झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी लष्कराने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले.