शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच, उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 06:34 IST

घटस्फोटासाठी हे वैध कारण आहे, असे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

जबलपूर (मध्य प्रदेश) : लग्नानंतर लग्नाची कर्तव्ये पार न पाडणे आणि शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच आहे. घटस्फोटासाठी हे वैध कारण आहे, असे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पत्नीने लग्नाची पूर्तता करण्यास नकार दिला आणि २००६ मध्ये लग्न झाल्यापासून शारीरिक जवळीक नाकारली, या कारणास्तव न्यायमूर्ती शील नागू आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठाने ३ जानेवारी रोजी एका पुरुषाला घटस्फोट मंजूर केला. “विवाहपूर्ती न करणे आणि शारीरिक जवळीक नाकारणे म्हणजे मानसिक क्रूरता आहे,” असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

२०११ मध्ये, त्या व्यक्तीने घटस्फोटासाठी भोपाळमधील कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. २०१४ मध्ये कौटुंबिक न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे की, अनेक प्रसंगी महिलेने लग्नपूर्ती करण्यास आणि तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. कोणत्याही शारीरिक अक्षमतेशिवाय किंवा वैध कारणाशिवाय एकतर्फी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे हे मानसिक क्रूरता ठरू शकते.

कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करताना उच्च न्यायालयाने म्हटले की, पत्नीने लग्नाची कर्तव्ये पार न पाडणे  हे घटस्फोटाचे कारण असू शकत नाही, हा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश चुकीचा आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. 

पत्नी म्हणाली, माझे प्रियकरासोबत लग्न लावून द्या... पुरुषाने दाखल केलेल्या अपिलानुसार, जुलै २००६ मध्ये त्याचे लग्न झाले. तथापि, त्याच्या पत्नीने आपले लग्न बळजबरीने लावले गेले, असा दावा करीत त्याच्यासोबत राहण्यास आणि लग्नपूर्ती करण्यास नकार दिला.आपले दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे, असे सांगत पत्नीने त्यांना एकत्र आणण्याची विनंती पतीकडे केली. त्यानंतर पती त्याच महिन्यात कामासाठी अमेरिकेला निघून गेला आणि सप्टेंबरमध्ये ती महिला तिच्या माहेरी राहायला गेली आणि परत आलीच नाही.

टॅग्स :Divorceघटस्फोटCourtन्यायालय