शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेसह १८ पक्षांची राज्यघटनादिनी निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 04:53 IST

सरकार, घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्ती, नागरिक यांनी घटनात्मक नैतिकतेचे पालन करावे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी म्हटले आहे. ७० व्या राज्यघटनादिनानिमित्त आयोजिलेल्या संसदेच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.

नवी दिल्ली : सरकार, घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्ती, नागरिक यांनी घटनात्मक नैतिकतेचे पालन करावे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी म्हटले आहे. ७० व्या राज्यघटनादिनानिमित्त आयोजिलेल्या संसदेच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.त्यांनी सांगितले की, राज्यघटना ही सर्वोच्च असून तिच्या सर्व तरतुदींचे नीट पालन करायला हवे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. राज्यघटनेतील मूल्यांचा तसेच घटनात्मक संस्थांचा आदर करून त्यानुसार आपले वर्तन राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राज्यघटनेने भाषण व विचारस्वातंत्र्य हे मूलभूत हक्क बहाल केले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण व हिंसाचाराला दूर राखणे या जबाबदाऱ्याही नागरिकांवर सोपविल्या आहेत.रामनाथ कोविंद म्हणाले की, देशातील लोकशाही पद्धतीच्या कारभारासाठी राज्यघटना दीपस्तंभासारखे कार्य करते. भारतातील लोकशाहीचा जगभरात आदर केला जातो. १७ व्या लोकसभेमध्ये ७८ महिला खासदार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने महिला खासदार या सभागृहात आजवर कधीही निवडून आल्या नव्हत्या याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधले. राज्यघटना दिनानिमित्त आयोजिलेल्या संसदेच्या संयुक्त बैठकीवर काँग्रेस, शिवसेनेसह अठरा पक्षांनी बहिष्कार घातला होता. या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद भवनाच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमून मोदी सरकारच्या विरोधात मूक निदर्शने केली. त्या पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेस, सप, द्रमुक, माकप, भाकप, आययूएमल, व्हीसीके आदी पक्षांचा समावेश होता. या निदर्शनांत बसप मात्र सहभागी झाली नव्हती.देशाचे स्वातंत्र्य धोक्यात घालू नका : नायडूसंप्रदायवादापासून देशाला दूर ठेवले पाहिजे, असे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. या विचारांच्या विपरीत वर्तन घडल्यास देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. नागरिकांमध्ये मूलभूत हक्कांविषयी लोकप्रतिनिधींनी जागृती निर्माण करावी, असेही ते म्हणाले.लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, घटनेतील तत्त्वांनुसार आपली कर्तव्ये बजावून खासदारांनी लोकांसमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. आपली कर्तव्ये नीट न बजावता नागरिक केवळ स्वत:च्या हक्कांबाबतच जागरूक राहिले तर त्यामुळे असंतुलन निर्माण होऊन त्याचा देशाच्या विकासावरही परिणाम होईल.जबाबदाऱ्यांकडेही लक्ष हवे : पंतप्रधानआजतागायत नागरिकांच्या हक्कांवरच जोर देण्यात येत असे; पण आता नागरिकांनी आपल्यावरील जबाबदाºयांवरही लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटना दिनानिमित्त संसदेच्या संयुक्त बैठकीत सांगितले. भारतीय राज्यघटनेने नागरिकांचे हक्क व कर्तव्ये काय आहेत याविषयी सविस्तर विवेचन केले आहे.राज्यघटनेने नागरिकांवर सोपविलेली जबाबदारी कशी पूर्ण करता येईल, याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनNew Delhiनवी दिल्ली