शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

'लोकशाहीमध्ये जनता हीच मालक; कॉँग्रेस केवळ जनतेचा आवाज ऐकण्यासाठी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 03:18 IST

लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते, असे कॉँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी ठासून सांगितले. कोणते काम केले पाहिजे, ते आमच्या पक्षाच्या सरकारला सांगा, ते केले जाईल,

सिमडेगा : लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते, असे कॉँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी ठासून सांगितले. कोणते काम केले पाहिजे, ते आमच्या पक्षाच्या सरकारला सांगा, ते केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. प्रचार सभेत ते म्हणाले की, लोकशाहीत तुम्हीच मालक आहात, याचा विसर पडू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अन्य कोणी नेता तुमचा मालक नाही. काय केले पाहिजे ते फक्त तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही ते करू. कॉँग्रेस ज्या महाआघाडीचा भागीदार आहे, ती जनतेचा आवाज ऐकण्यासाठी आहे. नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमावर टीका करून, आपण येथे मन की बात ऐकविण्यासाठी नव्हे, तर तुमचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी आलो आहोत, असेही ते म्हणाले.

कृषी क्षेत्र संकटात असताना मोदी यांनी शेतकऱ्यांना कर्जे मिळू दिली नाहीत. मोदी सरकारने जवळच्या १५ ते २० उद्योगपतींना मात्र फायदा करून दिला, या आरोपाचा गांधी यांनी पुनरुच्चार केला. आदिवासींची जमीन हिरावून घेतली जाऊ नये, यासाठी आमचा पक्ष वचनबद्ध असल्याचे सांगून, जीएसटीची अंमलबजावणी हलगर्जीपणे केल्याबद्दल त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. कॉँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर दरमहा १२ हजार रुपयांपेक्षा ज्या कुटुंबांचे उत्पन्न कमी आहे, अशांच्या बँक खात्यात दरवर्षी ७२ हजार रुपये जमा केले जातील. देशातील पाच कोटी कुटुंबांना या न्याय रोजनेचा लाभ मिळेल. कॉँग्रेस गरिबांवर रुग्णालयांमध्ये नि:शुल्क उपचार करण्याची योजना आणेल, असे सांगून गांधी म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर कुशल कर्मचारी बळ निर्माण करता यावे यासाठी जिल्ह्यांमध्ये तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था उघडण्यात येतील.

मुंडा विरुद्ध मुंडायेथील खुंटी मतदारसंघातून काँग्रेसचे कालिचरण मुंडा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपतर्फे माजी मुख्यमंत्री अर्जुनमुंडा यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी