रेणातील पाणी उपसा थांबविण्याची मागणी
By Admin | Updated: July 13, 2015 16:07 IST2015-07-13T16:07:32+5:302015-07-13T16:07:32+5:30
पानगाव : भंडारवाडी रेणा मध्यम प्रकल्पात असलेला अल्प पाणीसाठ्याचा विद्युत मोटारी लावून अवैधरित्या उपसा केला जात आहे़ हा पाणी उपसा थांबविण्याची मागणी पानगाव ग्रामपंचायतीने शनिवारी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रेणातील पाणी उपसा थांबविण्याची मागणी
प नगाव : भंडारवाडी रेणा मध्यम प्रकल्पात असलेला अल्प पाणीसाठ्याचा विद्युत मोटारी लावून अवैधरित्या उपसा केला जात आहे़ हा पाणी उपसा थांबविण्याची मागणी पानगाव ग्रामपंचायतीने शनिवारी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.भंडारवाडी रेणा मध्यम प्रकल्पावरून रेणापूरपूरक पाणीपुरवठा, दहाखेडी पाणीपुरवठा, बिटरगाव सातखेडी, सातखेडी पटी वडगाव पाणीपुरवठा होतो़ या प्रकल्पातून तालुक्यातील ३४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावल्याने रेणा मध्यम प्रकल्पात अल्प जलसाठा निर्माण झाला़ परंतु, गेल्या तीन आठवड्यांपासून वरुणराजाने दडी मारली आहे़ त्यामुळे खरीप पिके वाळत आहेत़ प्रकल्प परिसरातील शेतकरी ऊस व खरीप पिके जगविण्यासाठी प्रकल्पातील पाण्याचा उपयोग करीत आहेत़ गावांवरील पाणीसंकट दूर करण्यासाठी रेणा धरणातील पाणी आरक्षित करावे, अशी मागणी पानगाव ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच चंद्रचूड चव्हाण यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.