वीटभीवरील रॉयल्टी वाढ कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:17+5:302015-08-18T21:37:17+5:30
बार्शी:

वीटभीवरील रॉयल्टी वाढ कमी करण्याची मागणी
ब र्शी: सध्या पाऊस पडत नसल्यामुळे सर्वच क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली असून, बाजारपेठेतही मंदीची परिस्थिती तयार झाली आहे़ असे असताना शासनाने वीटभीचालक वापरत असलेल्या मातीच्या रॉयल्टीमध्ये केलेली दुप्पट वाढ ही कमी करावी, अशी मागणी शहरातील वीटभीचालकांनी तहसीलदारांकडे केली आहे़ याबाबत त्यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले़ या निवेदनामध्ये म्हटले आहे की, अनेक वीटभीचालक हे हलाखीच्या परिस्थितीतून हा व्यवसाय करीत आहेत़ तसेच या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा संसार सुरु आहे़ पूर्वी वीटभीचालकांकडून प्रतिब्रास ऐंशी रुपये रॉयल्टीची आकारणी केली जात होती़ मात्र प्रशासनाने अचानक रॉयल्टीमध्ये तिप्पट वाढ करुन ती प्रतिब्रास २४० रुपये केली आहे़ ही वाढ अन्यायकारक असून ती कमी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे़ तसेच शासनाने वीटभ्या अधिकृत कराव्यात मात्र अन्यायकारक वाढ परवडणार नाही, असे या निवेदनात म्हटले आहे़ यावेळी पृथ्वीराज रजपूत, बाबुराव जाधव, चंद्रकांत निमक, बाळासाहेब लांडे, पिंटू माळगे, राजेंद्र जोडगे, तानाजी मस्के, योगेश जाधव, बप्पा जाधव, विश्वनाथ गायकवाड, लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासह वीटभीचालक उपस्थित होते़ चौकट बार्शी शहरात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून, शहरात ८० ते ८५ वीटभी आहेत तर तालुक्यात ६० वीटभ्या आहेत़ या व्यवसायावर साधारणपणे दोन ते तीन हजार कामगार अवलंबून आहेत़