त्र्यंबकेश्वर पालिकेच्या सेंद्रिय खताला मागणी ।
By Admin | Updated: March 24, 2015 23:48 IST2015-03-24T23:06:52+5:302015-03-24T23:48:53+5:30
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक पालिकेचा कचरा डेपो गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वाढतच होता. इतका वाढला होता की, कचरा डिपिंग करायला जागा नव्हती. जागा कुठे मिळेना, शेवटी कचर्याचे रूपांतर मातीत करून त्याचे खत तयार करू या पार्श्वभूमीवर ३ बी इन्हायरो या कंपनीने ही किमया करून दाखविली. आज दिवसेंदिवस कचर्यापासून खत होऊ लागल्याने खताला मागणीदेखील चांगली असून, दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

त्र्यंबकेश्वर पालिकेच्या सेंद्रिय खताला मागणी ।
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक पालिकेचा कचरा डेपो गेल्या ५० ते ६० वर्षांपासून वाढतच होता. इतका वाढला होता की, कचरा डिपिंग करायला जागा नव्हती. जागा कुठे मिळेना, शेवटी कचर्याचे रूपांतर मातीत करून त्याचे खत तयार करू या पार्श्वभूमीवर ३ बी इन्हायरो या कंपनीने ही किमया करून दाखविली. आज दिवसेंदिवस कचर्यापासून खत होऊ लागल्याने खताला मागणीदेखील चांगली असून, दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
त्र्यंबक नगरपालिकेने हे काम ४० लाख ५५ हजाराला कंपनीला दिले. याबाबत विचारले असता कंपनीला हे काम काहीच परवडले नाही. ३ पोकलोन, कचरा चाळण्याच्या ३ मशीन्सद्वारे कचरा चाळला जात असून पोकलोनचे पोल २० लक्ष रुपयांच्या आसपास होणार आहे. तर चाळण्याच्या मशीन्स किमा १५ लक्ष रुपये होईल. याशिवाय अजून थोडे काम बाकी आहे.
विशेष म्हणजे नवीन कचरा (ओला) दररोज तेथे पडत आहे. या कचर्याला जागा करून द्यावी. आता कराराप्रमाणे रस्त्याच्या कडेचा कचरा प्रक्रिया सुरू असून येत्या ४० दिवसात या कचर्याचे रुपांतर मातीत होणार आहे.
इबी इन्व्हायरो कंरनीने कचर्यापासून चाळलेले तयार खताला चांगला प्रतिसाद मिळत आहे. निफाड व नाशिक तालुक्यात मोठमोठे ट्रक कररोज येत आहेत आणि कोणतेही मानधन न घेता लोक मोफत ट्रकच्या ट्रक खत नेत आहेत. अजूनही कोणाला हवे असल्यास त्यांनी इबी इन्व्हायरो कंपनीशी संपर्क साधून खत घेऊन जावे असे कंपनीतर्फे आवाहन केले आहे. (वार्ताहर)
-----