उद्योग केंद्राच्या कर्ज प्रकरणात सावळा गोंधळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून चौकशीची मागणी

By Admin | Updated: December 20, 2015 23:59 IST2015-12-20T23:59:48+5:302015-12-20T23:59:48+5:30

सोलापूर:

Demand for inquiry by NCP Youth Congress, in silence on industrial center's debt issue | उद्योग केंद्राच्या कर्ज प्रकरणात सावळा गोंधळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून चौकशीची मागणी

उद्योग केंद्राच्या कर्ज प्रकरणात सावळा गोंधळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून चौकशीची मागणी

लापूर:
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीजभांडवल कर्ज योजना राबविण्यात आली आहे. यात सावळा गोंधळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला असून, यासंबंधी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.
जिल्हा उद्योग केंद्राच्या या योजनेद्वारे 601 उमेदवार मुलाखतीस पात्र होते. त्यापैकी 384 प्रस्तावांना जिल्हा उद्योग कें द्राकडून मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित सुशिक्षित बेरोजगारांची कर्जप्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत. सदर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना नाव, पत्ता, व्यवसाय एवढेच प्रश्न विचारुन मुलाखतीची प्रक्रिया घेण्यात आली. अशा पद्धतीने उच्च बेरोजगार तरुणांची मुलाखत घेऊन त्यांची प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत.
जिल्हा उद्योगाच्या या प्रक्रियेमुळे पुन्हा एकदा उच्चशिक्षित बेरोजगार तरुण बेकार होण्याच्या मार्गावर आहेत तसेच नामंजूर झालेली प्रकरणे कोणत्या कारणांमुळे नामंजूर करण्यात आली आहेत, याची माहिती देण्यात आलेली नाही. यासंबंधी उमेदवारांना विचारले असता अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे बेरोजगारांवर अन्याय झाला आहे.
या उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी योग्य ती चौकशी करून न्याय देण्याची ग्वाही दिली. जिल्हा उद्योग केंद्राकडून न्याय न मिळाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा विनायक विटकर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for inquiry by NCP Youth Congress, in silence on industrial center's debt issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.