शालेय पोषण आहार योजनेतून मुख्याध्यापकांना वगळण्याची मागणी
By Admin | Updated: May 18, 2014 20:46 IST2014-05-18T19:57:05+5:302014-05-18T20:46:05+5:30
शालेय पोषण आहार शिजवून देण्याच्या प्रक्रियेतून मुख्याध्यापकांना वगळण्याची कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मागणी.

शालेय पोषण आहार योजनेतून मुख्याध्यापकांना वगळण्याची मागणी
अकोला : शालेय पोषण आहार शिजवून देण्याच्या प्रक्रियेतून मुख्याध्यापकांना वगळण्यात यावे, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने अपर जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. जिल्ातील सर्व गावे टंचाईसदृश जाहीर केल्यामुळे शिक्षणाधिकार्यांनी उन्हाळच्या सुट्यांमध्ये शालेय पोषण आहार शिजवून देण्याकरिता मुख्याध्यापकांना आदेश दिले आहेत. मात्र, उन्हामुळे विद्यार्थी शाळेत येत नाहीत. तसेच शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मुख्याध्यापकांना या योजनेतून वगळण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सर्व मुख्याध्यापकांना शालेय पोषण आहार शिजवून देण्याच्या कामातून वगळण्यात यावे, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गायकवाड, सचिव विनोद काळपांडे, शफिऊर रहेमान, गणेश राऊत, अमर गजभिये, विनोद किरतकार, बाळासाहेब गवई, राहुल धांडे, नितीन मुडा, प्रशांत शिरसाट यांनी अपर जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.