शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

उमवितून कमी केलेल्या २४ कामगारांना कामावर घेण्याची मागणी

By admin | Updated: March 13, 2016 00:04 IST

जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सबळ कारण नसताना २४ कंत्राटी कामगारांना ऑगस्ट २०१४ पासून कामावरून कमी केले आहे. हे कामगार मागासवर्गीय आहेत. म्हणून त्यांना कामावरून कमी केले काय, असा संशय भारतीय मजदूर संघाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे उपस्थित केले आहे. मजदूर संघाने विद्यापीठाकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या. राज्यपाल यांनी यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना विद्यापीठाला दिली, पण या कामगारांना कामावर घेतले नाही.

जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सबळ कारण नसताना २४ कंत्राटी कामगारांना ऑगस्ट २०१४ पासून कामावरून कमी केले आहे. हे कामगार मागासवर्गीय आहेत. म्हणून त्यांना कामावरून कमी केले काय, असा संशय भारतीय मजदूर संघाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे उपस्थित केले आहे. मजदूर संघाने विद्यापीठाकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या. राज्यपाल यांनी यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना विद्यापीठाला दिली, पण या कामगारांना कामावर घेतले नाही.
संबंधित कमी केलेले कामगार २००८ पासून विद्यापीठात विविध ठेकेदारांच्या माध्यमातून सफाईचे काम करीत होते. नंतर बीव्हीजी इंडियाकडे ऑगस्ट २०१४ पासून ठेका देण्यात आला. या कंपनीने संबंधित सफाई कामगारांना सबळ कारण न देता कमी केले. या कामगारांनी संघटना स्थापन करून कायद्यानुसार किमान वेतन, बोनस, भविष्य निर्वाह निधीची मागणी केली होती. आंदोलने केली म्हणून या कामगारांना कमी केले काय, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी, सहायक कामगार आयुक्त यांनाही पत्र देऊन कार्यवाही करण्याचे आदेश राज्यपाल यांनी दिले. मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष पी.जे.पाटील, महामंत्री प्रभाकर बाणासुरे यांनी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ.अशोक महाजन, कायदा अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना कामावर घेण्याची मागणी केली होती. कामगार चोर नाहीत. त्यांचा अधिकार त्यांना मिळावा, असे अधिकार्‍यांना लक्षात आणून दिले, पण अधिकार्‍यांनी कंत्राटदारांकडे बोट दाखविले. आजपर्यंत या कामगारांना कामावर घेतले नाही. यासंदर्भात राज्यपालन, शिक्षणमंत्री यांनी लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.