५0 गाड्यांची मागणी रद्द (एसएमटी जोडा....)
By Admin | Updated: September 2, 2015 23:31 IST2015-09-02T23:31:54+5:302015-09-02T23:31:54+5:30
केंद्रीय योजनेतून एसएमटीला २00 नवीन बसगाड्या मंजूर झाल्या आहेत. वॉल्व्हो बससह १४५ गाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यामुळे परिवहनचे उत्पन्न आठ लाखांवर गेले आहे. ताफ्यातील कित्येक बस कर्मचारी व मार्गामुळे बसून आहेत. मनपा हद्दीबाहेर ४0 किमी प्रवासाला परवानगीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली. प्रस्ताव गृहखात्याकडे प्रलंबित आहे. अशात परिवहन कर्मचार्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे आयुक्त काळम-पाटील यांनी बुधवारी ५0 गाड्यांची मागणी रद्द केली.

५0 गाड्यांची मागणी रद्द (एसएमटी जोडा....)
क ंद्रीय योजनेतून एसएमटीला २00 नवीन बसगाड्या मंजूर झाल्या आहेत. वॉल्व्हो बससह १४५ गाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यामुळे परिवहनचे उत्पन्न आठ लाखांवर गेले आहे. ताफ्यातील कित्येक बस कर्मचारी व मार्गामुळे बसून आहेत. मनपा हद्दीबाहेर ४0 किमी प्रवासाला परवानगीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली. प्रस्ताव गृहखात्याकडे प्रलंबित आहे. अशात परिवहन कर्मचार्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे आयुक्त काळम-पाटील यांनी बुधवारी ५0 गाड्यांची मागणी रद्द केली. आठ लाखांचे नुकसानकामबंद आंदोलनामुळे बुधवारी आठ लाखांचे परिवहनचे उत्पन्न बुडाले. याशिवाय आंदोलन यशस्वी करण्यासाठी सातरस्ता बसडेपोच्या प्रवेशद्वारावर बसची चाके निखळून टाकणार्या कर्मचार्यांची चौकशी सुरू झाली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बसची चाके काढून टाकण्याचे परिवहन कर्मचार्यांचे कृत्य अक्षम्य असल्याचे मत आयुक्तकाळम-पाटील यांनी केले आहे. अशा समाज विघातक वृत्तीमुळे शहरातील उद्योग बंद पडले. बेकारी वाढली. पोटाची चिंता नसेल तर खुशाल नुकसान करा. बससेवा अत्यावश्यक सेवेत नाही. राज्य परिवहन किंवा खासगी व्यवस्थापनाकडे हे खाते देता येईल. कर्मचार्यांचे बरेच प्रश्न आहेत. समस्या सोडविण्यासाठी मला वेळ द्या व प्रामाणिकपणे कामावर हजर व्हा असे आवाहन त्यांनी केले.