शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

दिल्लीत पाणी सुद्धा खराब; गुणवत्ता रँकिंग यादीत 'मुंबई' टॉप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 16:12 IST

देशातील 21 शहरांची यादी जाहीर

नवी दिल्ली : दिल्लीतील हवा नाही तर पाणी सुद्धा प्रदूषित आहे. केंद्र सरकारने देशातील 21 शहरांतील पाण्याची चाचणी केली. यात मुंबईतीलपाणी सर्वोत्तम म्हणजेच स्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. तर दिल्लीतील पाणी खराब असल्याचे आढळून आले. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी पाण्यातील गुणवत्तेच्या आधारावर देशातील 21 शहरांची यादी जाहीर केली आहे. 

या यादीत मुंबई, हैदराबाद, भुवनेश्वर, रांची आणि रायपूर टॉपमध्ये आहेत. त्यानंतर अनुक्रमे अमरावती, शिमला, चंदीगड, त्रिवेंद्रम, पटना, भोपाळ, गुवाहाटी, बंगळुरू, गांधीनगर, लखनऊ, जम्मू, जयपूर, डेहराडून, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली आहे.  

केंद्र सरकारने ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सला (बीआयएस) देशातील विविध शहरांतील पाण्याचे नमुने एकत्र करून त्यासंबंधी चौकशी करण्याचे आणि त्यानुसार रँकिंग जारी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार, आज रामविलास पासवान यांनी पाणी गुणवत्ता अहवाल आणि रँकिंग जारी केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पाण्याची चाचणी 10 मानकांवर करण्यात आली आहे. 

मुंबईतील पाणी प्रत्येक मानकांमध्ये पास झाले आहे. तर मानकांनुसार, इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतील पाणी खराब असल्याचे दिसून आले. यावेळी रामविलास पासवान म्हणाले,"आम्ही कोणत्याही सरकारला दोष  देत नाही. या विषयावरून आम्ही राजकारण करत नाही. तर आमचे उद्दिष्ट लोकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचले पाहिजे. त्यामुळे दिल्ली सरकारने समजून घेतले पाहिजे." 

याचबरोबर, देशातील शहरांमध्ये पाणी गुणवत्ता चाचणी यापुढे सुद्धा केली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीन टप्प्यांत चाचणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सर्व राजधानींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात सर्व जिल्ह्यांतील पाण्याची चाचणी करण्यात येणार असल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले. याशिवाय, प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोहोचविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभियान सुरूच राहिल. नरेंद्र मोदींनी 2024 पर्यंत प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोचविणार म्हटले आहे. त्या दिशेने आमचे सरकार काम करत आहे, असेही रामविलास पासवान यांनी सांगितले.    

टॅग्स :WaterपाणीMumbaiमुंबईdelhiदिल्ली