शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

दिल्लीत पाणी सुद्धा खराब; गुणवत्ता रँकिंग यादीत 'मुंबई' टॉप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 16:12 IST

देशातील 21 शहरांची यादी जाहीर

नवी दिल्ली : दिल्लीतील हवा नाही तर पाणी सुद्धा प्रदूषित आहे. केंद्र सरकारने देशातील 21 शहरांतील पाण्याची चाचणी केली. यात मुंबईतीलपाणी सर्वोत्तम म्हणजेच स्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. तर दिल्लीतील पाणी खराब असल्याचे आढळून आले. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी पाण्यातील गुणवत्तेच्या आधारावर देशातील 21 शहरांची यादी जाहीर केली आहे. 

या यादीत मुंबई, हैदराबाद, भुवनेश्वर, रांची आणि रायपूर टॉपमध्ये आहेत. त्यानंतर अनुक्रमे अमरावती, शिमला, चंदीगड, त्रिवेंद्रम, पटना, भोपाळ, गुवाहाटी, बंगळुरू, गांधीनगर, लखनऊ, जम्मू, जयपूर, डेहराडून, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली आहे.  

केंद्र सरकारने ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सला (बीआयएस) देशातील विविध शहरांतील पाण्याचे नमुने एकत्र करून त्यासंबंधी चौकशी करण्याचे आणि त्यानुसार रँकिंग जारी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार, आज रामविलास पासवान यांनी पाणी गुणवत्ता अहवाल आणि रँकिंग जारी केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पाण्याची चाचणी 10 मानकांवर करण्यात आली आहे. 

मुंबईतील पाणी प्रत्येक मानकांमध्ये पास झाले आहे. तर मानकांनुसार, इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतील पाणी खराब असल्याचे दिसून आले. यावेळी रामविलास पासवान म्हणाले,"आम्ही कोणत्याही सरकारला दोष  देत नाही. या विषयावरून आम्ही राजकारण करत नाही. तर आमचे उद्दिष्ट लोकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचले पाहिजे. त्यामुळे दिल्ली सरकारने समजून घेतले पाहिजे." 

याचबरोबर, देशातील शहरांमध्ये पाणी गुणवत्ता चाचणी यापुढे सुद्धा केली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीन टप्प्यांत चाचणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सर्व राजधानींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात सर्व जिल्ह्यांतील पाण्याची चाचणी करण्यात येणार असल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले. याशिवाय, प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोहोचविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभियान सुरूच राहिल. नरेंद्र मोदींनी 2024 पर्यंत प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोचविणार म्हटले आहे. त्या दिशेने आमचे सरकार काम करत आहे, असेही रामविलास पासवान यांनी सांगितले.    

टॅग्स :WaterपाणीMumbaiमुंबईdelhiदिल्ली