शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Delhi Violence: रस्ते निर्मनुष्य, तणाव मात्र कायम; दगडफेक, आगीच्या तुरळक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 06:59 IST

कडक सुरक्षा यंत्रणा असतानाही काही भागात दुकाने जाळण्यात आली आणि काही ठिकाणी दगडफेक झाली.

- विकास झाडे नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांत हिंसाचाराने २४ बळी घेतले. पोलीस व निमलष्करी दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याचे चित्र असले तरी गल्लीबोळात धग कायम आहे. कडक सुरक्षा यंत्रणा असतानाही काही भागात दुकाने जाळण्यात आली आणि काही ठिकाणी दगडफेक झाली.या भागात फेरफटका मारताना पुढच्या क्षणी काय होईल? अशी भीती मनात असते. प्रत्येकाचीच अशी अवस्था आहे. सोनिया विहार, गोकुळपुरी भागातील एका टायरच्या व भंगार दुकानांना आज आगी लावण्यात आल्या. जाफराबाद, कबीरनगर, विजयपार्क, मौजपुर, करावल नगर इथेही काहीशी दगडफेक झाली. उपद्रवी व असामाजिक व्यक्तींकडून सोशल मीडियात हिंसाचाराच्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकल्या जात असल्याने हिंसाचार होत आहे.ईशान्य दिल्लीतील हिंसाग्रस्त भागात बुधवारी सकाळी पोलीस व निमलष्करी दलाचा फ्लॅगमार्च झाला. तिथे सशस्त्र पोलीस आहेत. शिवाय अग्निशमन दलाच्या गाड्या, दंगलविरोधी ‘वज्र’ वाहन आणि आकस्मिक मदतीसाठी रुग्णवाहिका सज्ज आहेत. रस्ते निर्मनुष्य आहेत. सर्वत्र जाणवतो केवळ तणावच. हिंसाचाराच्या भीतीने लोक रस्त्यावर यायला तयार नाहीत. गल्लीबोळात मात्र ते गटांमध्ये दिसून येत आहेत. मौजपूरजवळील कबीरनगर परिसरात दोन दिवस जाळपोळ झाली. समाजकंटकांनी घरे व दवाखान्यांच्या खिडक्यांचा चुराडा केल्याने तिथे दहशत आहे. मंगळवारी इथे गोळीबार करण्यात आला. दोनशेवर लोक जखमी झाले आहेत. त्यामुळेच आज पोलिसांचा बंदोबस्त अगदी चोख होता.शांततेसाठी आवाहन!सर्वाधिक हिंसा झालेल्या जाफराबाद येथील मस्जिदीतून बुधवारी सायंकाळी शांततेचे आवाहन करण्यात आले. मुस्लिमांनी हिंसाचारात सहभागी होऊ नका, घराबाहेर पडू नका आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे करा, असे हे आवाहन होते.मंगळवारी रात्री असंख्य तरूण या भागात लोखंडी सळाखी, चाकू, लाठ्या घेऊन गल्लीबोळात फिरत होते. या मस्जिदीसमोर राहणारे ताहीर म्हणाले, आम्हाला हिंसा नको, सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत.

टॅग्स :delhi violenceदिल्ली