शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: परीक्षेला गेलेली 'ती' शाळकरी मुलगी पुन्हा घरी परतलीच नाही; हिंसाचाराचं भयानक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 14:59 IST

Delhi Violence News: ८ वीच्या वर्गात शिकणारी सोनिया विहार येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहते.

ठळक मुद्देदिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळणं लागलं सीएएविरोधातील आंदोलनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, माणसं मारली गेली

नवी दिल्ली - सीएए कायद्यावरुन दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा हिंसक वळण लागलं. सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले. या हिंसाचारात अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली. यातच उत्तर पूर्व दिल्लीतील खजूरी परिसरातून तीन दिवसापूर्वी परीक्षा देण्यासाठी गेलेली शाळकरी १३ वर्षाची शाळकरी मुलगी अद्याप बेपत्ता आहे. 

पोलिसांनी सांगितले की, ८ वीच्या वर्गात शिकणारी सोनिया विहार येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहते. सोमवारी सकाळी ती शाळेत जाण्यासाठी गेली, जवळपास साडेचार किमी अंतरावर तिची शाळा आहे. मात्र ती अद्याप परतली नाही. रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय असणाऱ्या तिच्या वडिलांनी सांगितले की, मला संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी मुलीला शाळेतून आणण्यासाठी जायचं होतं. पण आमच्या भागात सुरु झालेल्या दंगलीमुळे मी अडकलो. तेव्हापासून माझी मुलगी बेपत्ता असल्याचं ते म्हणाले. 

आम्ही मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंद केली आहे, मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे असं पोलीस म्हणाले तर मौजपूरच्या विजय पार्कमधील एका रहिवाशाने सांगितले की, दोन दिवसांपासून शिव विहारच्या एका घरात अडकलेल्या त्यांच्या कुटुंबाशी संपर्क झाला नाही. 

एका वयोवद्ध मोहम्मद सबीर म्हणाले की, मदीना मस्जिदजवळीळ शिव विहार येथे माझं घर आहे. माझी दोन मुले त्याठिकाणी राहतात तर विजय पार्क येथे दोघं राहतात. परिसरात सुरु असणाऱ्या दंगलीमुळे आमचा काहीही संपर्क होत नाही. आम्हाला काही लोकांनी घेरलं आहे असं त्यांनी फोनवरुन सांगितले. त्यानंतर ते आता कुठे आहेत याची कल्पना नाही असं ते बोलले, सध्या परिसरात तणाव असल्याने आम्हाला सहकार्य करा असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे. 

मौजपूर, जाफराबाद, चांदबाग, घोंडासह दिल्लीच्या पूर्वभागात सोमवारी हिंसाचार वाढला. यात ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तणावग्रस्त भागात पोलीस, राखीव पोलीस दल यांच्यासह अन्य जवान तैनात आहेत. बुधवारी काही भागात शांतता पसरली पण लोक आजही दहशतीखाली आहे. दिल्ली पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी १८ तक्रारी नोंदवल्या आहेत. तर १०८ जणांना अटकही केली आहे.  

 

टॅग्स :delhi violenceदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliceपोलिसMissingबेपत्ता होणंSchoolशाळा