शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

Delhi Violence: दिल्लीत हिंसा भडकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; खासदार गौतम गंभीर यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 14:40 IST

Delhi Violence News:शाहीनबागनंतर जाफरबाद आणि चांद बाग येथे रोड बंद केल्यामुळे कपिल मिश्रा यांनी रस्त्यावर येऊन धमकी दिली होती.

नवी दिल्ली - सीएएविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने देशाच्या राजधानी दिल्लीत हिंसक वळण घेतलं आहे. जाफराबाद येथे सुरु असलेल्या आंदोलनावरुन सीएए समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले. या दोन्ही गटाने एकमेकांवर दगडफेक सुरु केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

या संपूर्ण प्रकरणात भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्याविरोधात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप होत आहे. याबाबत भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी कपिल मिश्रा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गौतम गंभीर म्हणाले की, कोणताही व्यक्ती असो, कपिल शर्मा असो वा अन्य कोणीही त्याने फरक पडत नाही, कोणत्याही पक्षाचा माणूस असला तरी भडकाऊ भाषण देणाऱ्यावर कडक कारवाई होणं गरजेचे आहे असं मत त्यांनी व्यक्त केले. 

पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी भजनपुरा-मौजपूर येथील हिंसक घटनेत जखमी झालेले डीसीपी अमित शर्मा यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. जाफराबाद हिंसाचारात डिसीपी अमित शर्मा गंभीररित्या जखमी झालेत. सोमवारी रात्री त्यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या अमित शर्मा यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीच्या उत्तरेकडील भागात जो हिंसाचार सुरु आहे, त्यात कोणत्याही पक्षाचा माणूस असो, काँग्रेस असेल, आम आदमी पक्षापासून अन्य कोणीही, या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, जर कपिल मिश्रा यांचाही यात समावेश असेल तर त्यांच्यावरही गुन्हा नोंद करावा अशी मागणी भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी केली. 

काय बोलले होते कपिल मिश्रा?शाहीनबागनंतर जाफरबाद आणि चांद बाग येथे रोड बंद केल्यामुळे कपिल मिश्रा यांनी रस्त्यावर येऊन धमकी दिली होती. दिल्ली पोलिसांनी तीन दिवसाच्या आत रस्ता खुला करावा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापर्यंत आम्ही शांततापूर्वक आंदोलन करु, मात्र ३ दिवसानंतरही रस्ता खुला झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु त्यानंतर आम्ही दिल्ली पोलिसांचेही ऐकणार नाही. या भाषणानंतर दिल्लीत हिंसाचार भडकल्याचा आरोप केला जात आहे. 

दिल्लीत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यूदिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक महिन्यासाठी उत्तर दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. या हिंसाचारात मृत्यू झालेल्यांची संख्या ७ वर पोहचली आहे. जाफराबाद येथून हिंसाचाराला सुरुवात झाली असून त्याचे पडसाद अन्य भागातही उमटताना दिसत आहेत.     

टॅग्स :delhiदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकGautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपा