शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: दिल्लीत हिंसा भडकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; खासदार गौतम गंभीर यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 14:40 IST

Delhi Violence News:शाहीनबागनंतर जाफरबाद आणि चांद बाग येथे रोड बंद केल्यामुळे कपिल मिश्रा यांनी रस्त्यावर येऊन धमकी दिली होती.

नवी दिल्ली - सीएएविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने देशाच्या राजधानी दिल्लीत हिंसक वळण घेतलं आहे. जाफराबाद येथे सुरु असलेल्या आंदोलनावरुन सीएए समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले. या दोन्ही गटाने एकमेकांवर दगडफेक सुरु केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

या संपूर्ण प्रकरणात भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्याविरोधात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप होत आहे. याबाबत भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी कपिल मिश्रा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गौतम गंभीर म्हणाले की, कोणताही व्यक्ती असो, कपिल शर्मा असो वा अन्य कोणीही त्याने फरक पडत नाही, कोणत्याही पक्षाचा माणूस असला तरी भडकाऊ भाषण देणाऱ्यावर कडक कारवाई होणं गरजेचे आहे असं मत त्यांनी व्यक्त केले. 

पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी भजनपुरा-मौजपूर येथील हिंसक घटनेत जखमी झालेले डीसीपी अमित शर्मा यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. जाफराबाद हिंसाचारात डिसीपी अमित शर्मा गंभीररित्या जखमी झालेत. सोमवारी रात्री त्यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या अमित शर्मा यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीच्या उत्तरेकडील भागात जो हिंसाचार सुरु आहे, त्यात कोणत्याही पक्षाचा माणूस असो, काँग्रेस असेल, आम आदमी पक्षापासून अन्य कोणीही, या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, जर कपिल मिश्रा यांचाही यात समावेश असेल तर त्यांच्यावरही गुन्हा नोंद करावा अशी मागणी भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी केली. 

काय बोलले होते कपिल मिश्रा?शाहीनबागनंतर जाफरबाद आणि चांद बाग येथे रोड बंद केल्यामुळे कपिल मिश्रा यांनी रस्त्यावर येऊन धमकी दिली होती. दिल्ली पोलिसांनी तीन दिवसाच्या आत रस्ता खुला करावा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापर्यंत आम्ही शांततापूर्वक आंदोलन करु, मात्र ३ दिवसानंतरही रस्ता खुला झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु त्यानंतर आम्ही दिल्ली पोलिसांचेही ऐकणार नाही. या भाषणानंतर दिल्लीत हिंसाचार भडकल्याचा आरोप केला जात आहे. 

दिल्लीत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यूदिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक महिन्यासाठी उत्तर दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. या हिंसाचारात मृत्यू झालेल्यांची संख्या ७ वर पोहचली आहे. जाफराबाद येथून हिंसाचाराला सुरुवात झाली असून त्याचे पडसाद अन्य भागातही उमटताना दिसत आहेत.     

टॅग्स :delhiदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकGautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपा