शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

Delhi Violence: दिल्लीत हिंसा भडकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; खासदार गौतम गंभीर यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 14:40 IST

Delhi Violence News:शाहीनबागनंतर जाफरबाद आणि चांद बाग येथे रोड बंद केल्यामुळे कपिल मिश्रा यांनी रस्त्यावर येऊन धमकी दिली होती.

नवी दिल्ली - सीएएविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने देशाच्या राजधानी दिल्लीत हिंसक वळण घेतलं आहे. जाफराबाद येथे सुरु असलेल्या आंदोलनावरुन सीएए समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले. या दोन्ही गटाने एकमेकांवर दगडफेक सुरु केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

या संपूर्ण प्रकरणात भाजपा नेते कपिल मिश्रा यांच्याविरोधात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप होत आहे. याबाबत भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी कपिल मिश्रा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गौतम गंभीर म्हणाले की, कोणताही व्यक्ती असो, कपिल शर्मा असो वा अन्य कोणीही त्याने फरक पडत नाही, कोणत्याही पक्षाचा माणूस असला तरी भडकाऊ भाषण देणाऱ्यावर कडक कारवाई होणं गरजेचे आहे असं मत त्यांनी व्यक्त केले. 

पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी भजनपुरा-मौजपूर येथील हिंसक घटनेत जखमी झालेले डीसीपी अमित शर्मा यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. जाफराबाद हिंसाचारात डिसीपी अमित शर्मा गंभीररित्या जखमी झालेत. सोमवारी रात्री त्यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या अमित शर्मा यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीच्या उत्तरेकडील भागात जो हिंसाचार सुरु आहे, त्यात कोणत्याही पक्षाचा माणूस असो, काँग्रेस असेल, आम आदमी पक्षापासून अन्य कोणीही, या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, जर कपिल मिश्रा यांचाही यात समावेश असेल तर त्यांच्यावरही गुन्हा नोंद करावा अशी मागणी भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी केली. 

काय बोलले होते कपिल मिश्रा?शाहीनबागनंतर जाफरबाद आणि चांद बाग येथे रोड बंद केल्यामुळे कपिल मिश्रा यांनी रस्त्यावर येऊन धमकी दिली होती. दिल्ली पोलिसांनी तीन दिवसाच्या आत रस्ता खुला करावा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापर्यंत आम्ही शांततापूर्वक आंदोलन करु, मात्र ३ दिवसानंतरही रस्ता खुला झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु त्यानंतर आम्ही दिल्ली पोलिसांचेही ऐकणार नाही. या भाषणानंतर दिल्लीत हिंसाचार भडकल्याचा आरोप केला जात आहे. 

दिल्लीत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यूदिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक महिन्यासाठी उत्तर दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. या हिंसाचारात मृत्यू झालेल्यांची संख्या ७ वर पोहचली आहे. जाफराबाद येथून हिंसाचाराला सुरुवात झाली असून त्याचे पडसाद अन्य भागातही उमटताना दिसत आहेत.     

टॅग्स :delhiदिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकGautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपा