शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

Delhi Violence: दिल्लीत पुन्हा एकदा दहशतीचं सावट; रविवारी रात्री 'त्या' दोन तासांत काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 10:51 IST

Delhi Violence News: संध्याकाळी ७ च्या सुमारास व्हॉट्सअप ग्रुपमधून जैतपूर, जसोला, मदपूर येथे दंगल सुरु झाली आहे अशा अफवा पसरू लागल्या

ठळक मुद्देरस्त्यावर लोकं पळू लागली. दुकानांचे शटर बंद होऊ लागलेईशान्य दिल्लीत रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा खळबळ माजली. अचानक आलेल्या अफवेमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं

नवी दिल्ली - गेल्या आठवडाभरापासून दिल्लीत सीएए विरोधक आणि समर्थक यांच्यातील तणावामुळे वातावरण पेटलं आहे. दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत ४० पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. हजारो गाड्या जाळण्यात आल्या, दुकानांना आग लावली, या हिंसाचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला गेला. 

भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी लोकांना भडकवण्याचे काम केले असा आरोप केला जातो, त्यांच्यासह अन्य दोन नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानेही दिले. जाफराबाद, दयालपूर, मौजपूर अशा अनेक भागात हिंसाचारामुळे लोकं दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत. अशातच रविवारी पुन्हा एकदा आलेल्या एका मॅसेजमुळे पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली का? अशी भीती लोकांना वाटत होती. 

रस्त्यावर लोकं पळू लागली. दुकानांचे शटर बंद होऊ लागले. अनेकांचे मोबाईल फोन खणाणले, ईशान्य दिल्लीत रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा खळबळ माजली. अचानक आलेल्या अफवेमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं. नेमकं दिल्लीत रविवारी संध्याकाळी घडलं काय? असा प्रश्न उपस्थित झाला असेलच. 

संध्याकाळी ७ च्या सुमारास व्हॉट्सअप ग्रुपमधून जैतपूर, जसोला, मदपूर येथे दंगल सुरु झाली आहे अशा अफवा पसरू लागल्या. ही अफवा वाऱ्यासारखी पसरल्याने टिळक नगर स्टेशनचं प्रवेशद्वार बंद करण्यात आलं. व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून मॅसेज व्हायरल होऊ लागले, त्यानंतर नांगलोई, सूरजमल स्टेडियम, बदरपूर, तुगलकाबाद, उत्तम नगर, नवादा मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आले. एकापाठोपाठ एक अफवा वाढू लागल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली. विविध भागातून पोलिसांना हिंसाचार भडकल्याचे कॉल्स येऊ लागले. जवळपास ४०० पेक्षा अधिक कॉल्स पोलिसांना आले. 

जनकपुरी येथे डाबरीमध्ये राहणाऱ्या अंकित यांनी सांगितले की, संध्याकाळी ८ वाजता गल्लीत गर्दी होती. यातच अचानक काही लोक जोरजोरात ओरडत आले, दंगल सुरु झाले, गोळीबार करण्यात येत आहे. हे ऐकताच लोकांची पळापळ सुरु झाली. कॉलनीचं गेट बंद करण्यात आलं. दुकानं बंद करण्यात आली. रस्त्यावरुन लोक धावत असताना जोरात ओरडू लागले. काही लोक घराच्या बाल्कनीत उभे होते, कोणालाही काही समजत नव्हते. काही लोक सांगत होते टिळकनगर येथे दंगल झाली आहे. जवळपास २ तास असं वातावरण ईशान्य दिल्लीत पाहायला मिळालं. थोड्या वेळानंतर पोलिसांची गाडी आली त्यावेळी वातावरण शांत झालं. या दरम्यान, लोकांचे मोबाईल नेटवर्क बंद करण्यात आले होते. 

अशा प्रसंगी काय करावे?

  • सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या अफवा दुसऱ्यांकडे शेअर करु नये, कारण त्याची खातरजमा करणं कठीण असतं. त्यामुळे दहशतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. 
  • कोणत्याही प्रकारची हिंसा भडकेल अशा पोस्ट सोशल मीडियात टाकू नये, तसेच याला पुढाकार घेणाऱ्यांचे समर्थन करु नये. 
  • आपल्या परिसरात, कॉलनीत छोट्या छोट्या बैठका घेऊन आपापसात संवाद ठेवावा, त्यामुळे अफवा दूर होण्यास मदत होईल. 
  • आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली सुरु असल्यास तात्काळ त्याची माहिती पोलिसांना द्यावी 
टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया