शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
3
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
4
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
5
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
6
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
7
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
8
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
9
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
10
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
11
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
12
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
13
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
14
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
15
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
16
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
17
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
18
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
19
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
20
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)

Delhi Violence: हिंसाचारासाठी परदेशातून पैसे आले; अमित शहा यांची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 06:43 IST

पोलिसांनी ३६ तासांत हिंसाचार नियंत्रणात आणला

नवी दिल्ली : उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचारासाठी परदेशातून पैसे आले आणि ते २४ फेब्रुवारीपूर्वी वाटण्यात आले. यात संबंध असलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.

हिंसाचारप्रकरणी बुधवारी लोकसभेत चर्चा केल्यानंतर गुरुवारी राज्यसभेत घमासान चर्चा झाली. सभापती डॉ. सत्यनारायण जाटिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे आनंद शर्मा, भाजपचे प्रकाश जावडेकर, सपाचे जावेद अस्ली खान, बीजू जनता दलाचे प्रसन्न आचार्य, तेलंगाणा राष्ट्र समितीचे बंदा प्रकाश, बसपाचे अशोक सिद्धार्थ, आपचे संजय सिंह, अकाली दलाचे नरेश गुजराल, द्रमुकचे तिरुची शिवा आदी खासदारांनी भाषणे केली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर गृहमंत्री शहा यांनी त्यांच्या भाषणात हिंसाचाराबाबतचा खुलासा केला तसेच विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हिंसाचार कुणी घडविला यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यानुसार १९२२ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांना पकडण्यासाठी ४०हून अधिक विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. परदेशातून आलेले पैसे वाटण्यात आले आणि त्यानंतर हिंसाचार झाला आहे. विविध खात्यांमध्ये पैसे टाकण्यात आले. यात सहभागी असलेल्यांना पाताळातूनही शोधून काढू, असे शहा यांनी सभागृहास सांगितले. हिंसाचार होणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याची शहानिशा करण्याचे काम सुरू असतानाच हिंसाचार सुरू झाला. पोलिसांनी ३६ तासात हिंसाचार नियंत्रणात आणला, तो वाढू दिला नाही किंवा दिल्लीच्या अन्य भागातही तो होऊ दिला नाही, असे ते म्हणाले.आणखी एकास पकडलेगुप्तचर विभागाचा कर्मचारी अंकित शर्मा याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला पकडले आहे. सलमान ऊर्फ नन्हे असे त्याचे नाव आहे. उत्तर पूर्व दिल्लीतील हिंसाचारात शर्मा यांची हत्या झाली आहे. शर्मा यांचा मृतदेह चांदबाग येथील नाल्यात आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आपचा निलंबित माजी नगरसेवक ताहीर हुसैन याला अटक केली आहे. सलमानची नेमकी काय भूमिका आहे, याची चौकशी आता पोलीस करणार आहेत. पोलिसांना सलमानच्या सहभागाचे काही पुरावे मिळाले आहेत.कागदपत्र घेणार नाहीराष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर)मध्ये कुणाकडूनही काहीही कागदपत्रे मागितली जाणार नाहीत. तसेच, कुणाच्याही नावापुढे संशयास्पद असेही लिहीले जाणार नाही, असे शहा यांनी उत्तर देताना स्पष्ट केले. त्यामुळे याबाबत असलेला संभ्रम दूर झाला आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाdelhi violenceदिल्ली