शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

Delhi Violence: हिंसाचारासाठी परदेशातून पैसे आले; अमित शहा यांची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 06:43 IST

पोलिसांनी ३६ तासांत हिंसाचार नियंत्रणात आणला

नवी दिल्ली : उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचारासाठी परदेशातून पैसे आले आणि ते २४ फेब्रुवारीपूर्वी वाटण्यात आले. यात संबंध असलेल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.

हिंसाचारप्रकरणी बुधवारी लोकसभेत चर्चा केल्यानंतर गुरुवारी राज्यसभेत घमासान चर्चा झाली. सभापती डॉ. सत्यनारायण जाटिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे आनंद शर्मा, भाजपचे प्रकाश जावडेकर, सपाचे जावेद अस्ली खान, बीजू जनता दलाचे प्रसन्न आचार्य, तेलंगाणा राष्ट्र समितीचे बंदा प्रकाश, बसपाचे अशोक सिद्धार्थ, आपचे संजय सिंह, अकाली दलाचे नरेश गुजराल, द्रमुकचे तिरुची शिवा आदी खासदारांनी भाषणे केली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर गृहमंत्री शहा यांनी त्यांच्या भाषणात हिंसाचाराबाबतचा खुलासा केला तसेच विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हिंसाचार कुणी घडविला यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यानुसार १९२२ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांना पकडण्यासाठी ४०हून अधिक विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. परदेशातून आलेले पैसे वाटण्यात आले आणि त्यानंतर हिंसाचार झाला आहे. विविध खात्यांमध्ये पैसे टाकण्यात आले. यात सहभागी असलेल्यांना पाताळातूनही शोधून काढू, असे शहा यांनी सभागृहास सांगितले. हिंसाचार होणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याची शहानिशा करण्याचे काम सुरू असतानाच हिंसाचार सुरू झाला. पोलिसांनी ३६ तासात हिंसाचार नियंत्रणात आणला, तो वाढू दिला नाही किंवा दिल्लीच्या अन्य भागातही तो होऊ दिला नाही, असे ते म्हणाले.आणखी एकास पकडलेगुप्तचर विभागाचा कर्मचारी अंकित शर्मा याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला पकडले आहे. सलमान ऊर्फ नन्हे असे त्याचे नाव आहे. उत्तर पूर्व दिल्लीतील हिंसाचारात शर्मा यांची हत्या झाली आहे. शर्मा यांचा मृतदेह चांदबाग येथील नाल्यात आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आपचा निलंबित माजी नगरसेवक ताहीर हुसैन याला अटक केली आहे. सलमानची नेमकी काय भूमिका आहे, याची चौकशी आता पोलीस करणार आहेत. पोलिसांना सलमानच्या सहभागाचे काही पुरावे मिळाले आहेत.कागदपत्र घेणार नाहीराष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर)मध्ये कुणाकडूनही काहीही कागदपत्रे मागितली जाणार नाहीत. तसेच, कुणाच्याही नावापुढे संशयास्पद असेही लिहीले जाणार नाही, असे शहा यांनी उत्तर देताना स्पष्ट केले. त्यामुळे याबाबत असलेला संभ्रम दूर झाला आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाdelhi violenceदिल्ली