शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दिल्लीत सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावून फटाकेबाजी, स्थिती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 03:46 IST

दिल्लीवासीयांनी रात्रभर लाखो फटाके फोडत या शहरातील वातावरण प्रदूषित केले असून हवेचा दर्जा अतिशय गंभीर बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी आणली असतानाही धडाक्यात फटाके फोडण्यात आल्यामुळे हवा विषाक्त बनली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीवासीयांनी रात्रभर लाखो फटाके फोडत या शहरातील वातावरण प्रदूषित केले असून हवेचा दर्जा अतिशय गंभीर बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी आणली असतानाही धडाक्यात फटाके फोडण्यात आल्यामुळे हवा विषाक्त बनली आहे.प्रदूषणाचा स्तर दर्शविणा-या सरकारी ‘सफर’(सिस्टिम आॅफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अँड रिसर्च) या यंत्रणेचे चिन्ह गडद बनले आहे. सदृढ आरोग्य असणा-यांवरही परिणाम करणारे असे हे प्रदूषण असून श्वसन आणि हृदयासंबंधी आजारी लोकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.दिल्लीत गेल्या २४ तासात पीएम २.५ आणि पीएम १० ची सरासरी अनुक्रमे ४२४ आणि ५७१ मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर असून सुरक्षित मर्यादेपेक्षा त्याचे प्रमाण अनुक्रमे ६० ते १०० पट जास्त होते. अमेरिकेच्या दूतावासातील प्रदूषण निगराणी केंद्राने वायूच्या गुणवत्तेचा निर्देशांक ८७८ एवढा निश्चित केला असून तो अतिशय धोकादायक मानला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावेळी दिवाळीच्या काळातील वातावरण अधिक स्वच्छ होते. दिल्लीची संध्याकाळ शांत होती. दिल्लीच्या एनसीआर भागात सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांच्या विक्रीवर आणलेल्या बंंदीचा तो प्रभाव असावा, असे मानले जात होते, मात्र त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि कर्णकर्कश आवाजाची भर पडत गेली. पहाटेपर्यंत हा धडाका सुरू होता. सफर या यंत्रणेने लावलेल्या अंदाजानुसार दिल्लीतील वातावरण गेल्यावर्षी एवढे प्रदूषित नसले तरी दर्जा धोकादायक स्थितीपर्यंत खालावला आहे. तीन दशकांमध्ये गेल्यावर्षी सर्वात वाईट प्रदूषणाची नोंद झाली होती. गुडगाव, नोएडा, गाझियाबादमध्ये नेहमीप्रमाणे फटाके फुटले, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणाºया प्रशासकीय यंत्रणा निष्प्रभ ठरली. (वृत्तसंस्था)आगीच्या २०४ घटना, गोदाम जळून खाक...दिवाळीत फटाके फुटत असताना आगीच्या २०४ घटनांबाबत अग्निशमन केंद्राला फोन कॉल आले. त्यापैकी ५१ घटना फटाक्यांमुळे लागलेल्या आगीसंबंधी होत्या. पूर्व दिल्लीतील सुभाष मोहल्ल्यात भीषण आग लागून कापडाचे गोदाम खाक झाले. २६ बंबांनी ती आटोक्यात आणण्यात आली. १८ आॅक्टोबरची मध्यरात्र ते दिवाळीच्या मध्यरात्रीपर्यंत आगीच्या घटनांसंबंधी २०४ कॉल आल्याची माहिती दिल्ली अग्निशमन सेवेच्या(डीएफएस) अधिका-याने दिली.

टॅग्स :diwaliदिवाळीfire crackerफटाकेpollutionप्रदूषण