शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'आप'ला मोठा धक्का! दिल्ली विधेयकावर बीजेडीचा मोदी सरकारला पाठिंबा, जाणून घ्या आता दोन्ही सभागृहाचे गणित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 18:48 IST

दिल्ली सेवा विधेयक आणि अविश्वास प्रस्तावावर केंद्र सरकारला नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाचा (बीजेडी) पाठिंबा मिळाला आहे.

नवी दिल्ली : दिल्ली सेवा विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले. या वादग्रस्त विधेयकाच्या माध्यमातून केंद्र सरकारला दिल्लीतील नोकरशहांच्या बदल्या आणि नियुक्तीचे अधिकार देणारा अध्यादेश बदलण्यात येणार आहे. हे विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार उपराज्यपालांना असणार आहे. दरम्यान, दिल्ली सेवा विधेयक आणि अविश्वास प्रस्तावावर केंद्र सरकारला नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाचा (बीजेडी) पाठिंबा मिळाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सेवा विधेयक आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात अविश्वास प्रस्तावावर बीजेडी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ मतदान करणार आहे. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला विरोध करणार असल्याचे बीजेडीने ठरवले आहे. बीजेडीच्या पाठिंब्यानंतर राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर झाल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

काय आहे दोन्ही सभागृहाचे गणित?लोकसभेत भाजपचे बहुमत असून त्यांचे ३०१ खासदार आहेत. तर भाजपच्या मित्रपक्षांच्या एनडीए युतीबद्दल बोलायचे झाले तर खासदारांची संख्या आणखी वाढते. एनडीएच्या खासदारांची संख्या ३३३ आहे, जी बहुमताच्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे. दुसरीकडे, विरोधकांकडे केवळ १४२ खासदार आहेत, त्यापैकी ५० खासदार काँग्रेसचे आहेत. अशाप्रकारे लोकसभेत भाजपचे बहुमत आहे. याचबरोबर, राज्यसभेत भाजपच्या खासदारांची संख्या ९३ आहे, तर मित्रपक्षांच्या खासदारांची संख्या जोडल्यास हा आकडा १०५ वर पोहोचतो. एवढेच नाही तर भाजपला पाच नामनिर्देशित आणि दोन अपक्ष खासदारांचा पाठिंबा मिळेल, असे मानले जात आहे. त्यामुळे राज्यसभेत भाजपच्या एकूण खासदारांची संख्या ११२ वर पोहोचेल.

दरम्यान, हा आकडा जास्त वाटत असला तरी बहुमताच्या आकड्यापासून भाजप अजूनही ८ खासदार दूर आहे. विरोधी पक्षांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या खासदारांची संख्या १०५ आहे. दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर होण्यासाठी भाजपला बसपा, जेडीएस आणि टीडीपीच्या प्रत्येकी एका खासदाराची आवश्यकता असणार आहे. एवढेच नाही तर भाजप राज्यसभेत बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसवर अवलंबून आहे. बीजेडी आणि वायएसआर काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या खासदारांची संख्या ९ आहे. राज्यसभेत भाजपच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे दोन्ही पक्षांनी सांगितले आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही भाजपचा मार्ग सुकर होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसद