शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

दिल्लीत प्रदुषणामुळे पक्षी कोसळताहेत जमिनीवर; राजधानीचे झाले गॅस चेंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 01:16 IST

कृषी कचरा व फटाक्यांच्या धुरामुळे हवा झाली विषारी

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : वाढत्या प्रदूषणाच्या तडाख्यातून दिल्लीतील पक्षीदेखील सुटले नाहीत. विषारी हवेमुळे श्वसनास अडथळा आल्याने तीन दिवसांत शेकडो पक्षी उडता-उडता जमिनीवर कोसळले. चांदनी चौकातील पक्ष्यांच्या रूग्णालयात शंभरावर कबुतरांवर उपचार सुरू आहेत. रस्त्याच्या कडेला, झाडाखाली निपचित पडलेल्या पक्ष्यांना सहृदयी लोक रुग्णालयात आणल्याने त्यांचा जीव वाचला.पराली (कृषी कचरा) व फटाक्यांच्या धुरामुळे दिल्लीची हवा विषारी झाली. वायू गुणवत्ता निर्देशांक बुधवारी ७०० च्या वर गेला. तज्ज्ञांच्या मते पक्षांना फटाक्यांचा धुराचा त्रास होतो. प्राणवायू कमी पडत असल्याने एकाचवेळी श्वास घेणे व उडण्याची प्रक्रिया गतिमान होते. पक्षी दमतात व जमिनीवर कोसळतात, अशी माहिती चॅरिटी बर्ड हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने दिली.

अनेक पक्ष्यांचे अयवय निकामी होतात. शरीरातील पाणी कमी झाल्याने पक्ष्यांचा मृत्यू होतो, असे डॉ. हॅरी यांनी सांगितले. तीन दिवसांत या रूग्णालयात १४५ पक्ष्यांवर उपचार करण्यात आले. फटाक्यांमुळे दोन पक्षी भाजले. त्यांना पुन्हा आकाशात कधीच भरारी घेता येणार नाही.उपचारांनाही मर्यादातीन दिवसांत मी ३०-३५ पक्ष्यांवर उपचार केले. धुक्यामुळे पक्ष्यांना दिसत नाही. त्यामुळे ते इमारतींनाही धडकतात. जखमी होतात. पक्ष्यांचे फुफ्फुस नाजूक असते. त्यामुळे त्यांना औषध देताना विचार करावा लागतो. इंजेक्ट करण्यास मर्यादा असतात. शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी, रक्त शुद्ध करणारी औषधे त्यामुळे दिली जातात. - डॉ. हॅरी, चॅरिटी बर्ड हॉस्पिटल, चांदनी चौकहवेत मिसळले विष : दिवाळीनंतर दिल्लीच्या हवेत विष मिसळले आहे. लहान मुले, वृद्धांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. डोळ्यांची जळजळ, अंगास खाज सुटण्यासारखी लक्षणे जाणवू लागली आहेत. सकाळी फिरायला न जाण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. प्रदूषण कमी न झाल्यास 'आरोग्य आणीबाणी' जाहीर होण्याची शक्यता आहे. शाळांना दिवाळीची सुट्टी वाढवण्यावरही विचार सुरू आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणdelhiदिल्ली