शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हिंसा घडविणाऱ्यांची आता खैर नाही, दिल्ली पोलिसांनी तयार केल्या स्टीलच्या लाठ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 16:47 IST

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार घडवून पोलिसांवर हल्ला केलेल्यांना धडा शिकविण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कंबर कसली

Tractor Rally Violence: प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार घडवून पोलिसांवर हल्ला केलेल्यांना धडा शिकविण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कंबर कसली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आंदोलकांचा सामना करण्यासाठी पोलिसांना आता स्टीलच्या लाठ्या देण्यात येणार आहेत. दरम्यान, दिल्लीत पोलिसांकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

शेतकरी आंदोलन काळात पंजाबमध्ये पाकिस्तानमधून अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ

राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी केलेल्या हिंसाचारात तब्बल ४०० पोलीस जखमी झाले होते. यातील काही पोलिसांवर तलवार, लोखंडी रॉडसारख्या हत्यारांनी हल्ला करण्यात आला होता. अलीपूरचे पोलीस अधिकारी प्रदीप पालीवाल यांच्यावर एका आंदोलकानं केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात पालीवाल गंभीररित्या जखमी झाले होते. त्यामुळे आंदोलकांच्या अशा जीवघेण्या हत्यारांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी खास स्टीलच्या लाठ्या तयार केल्या आहेत. दिल्लीच्या शाहदारा जिल्ह्यात या लाठ्या तयार करण्यात आल्याअसून सध्या अशाप्रकारच्या ५० लाठ्या पोलिसांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

"पैसे घेऊन शेतकरी आंदोलन करताहेत"; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी निर्धारित मार्ग सोडून टॅक्टर रॅली घेऊन गेल्यानं पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. यात शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये ठिकठिकाणी झटापट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. काही ठिकाणी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या. पण शेतकरी आंदोलकांनी अधिक आक्रमक भूमिका घेत लाल किल्ला ताब्यात घेतला होता. लाल किल्ल्यावर आंदोलकांना धुडगूस घालून पोलिसांनाही अमानूष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. दिल्ली पोलीस आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या तोडफोडीची घटना देशविरोधी कृत्य असल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्ली