शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

'आंदोलकांवर दिल्ली पोलिसांचा गोळीबार, भाजपाचं गलिच्छ राजकारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 15:01 IST

दक्षिण दिल्लीतील एका आंदोलनावेळी तेथील बस गाड्यांना आग लावण्यात पोलिसांनीच पुढाकार घेतला होता

नवी दिल्ली - देशात नागरिक सुधारणा विधेयकावरुन रणकंदन माजलं आहे. नॉर्थ इस्ट राज्यांमध्ये नागरिक आक्रम झाले असून हिंसात्मक घटना घडत आहेत. नागरिक सुधारणा विधेयकाला विरोध करत विद्यार्थ्यांसह, तेथील नागरिकांनी मोठं आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाची धग देशभर जाणवत असून दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायलं मिळत आहे. दिल्लीतील आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार आणि गोळीबार करण्यात आला आहे. त्यावरुन, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. 

दक्षिण दिल्लीतील एका आंदोलनावेळी तेथील बस गाड्यांना आग लावण्यात पोलिसांनीच पुढाकार घेतला होता, असा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. सिसोदिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिल्ली पोलिस बसला आग लावताना दिसत आहेत. तसेच, व्हिडिओमध्ये पोलिसांकडून गोळीबार करण्यात येत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे विनाकारण गाड्यांची तोडफोड पोलिसांकडून होत आहे. भाजपाकडून गलिच्छ राजकारण होत असून दिल्लीत भडकलेल्या हिंसेचा नि:पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणीही सिसोदिया यांनी केलीय.   

लखनौमधील नदवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनीही विधयेकास विरोध करत मोदी सरकारचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे, पोलिसांनी कॉलेजचे गेटच बाहेरुन बंद केलंय. जामिया येथील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात येत आहे. तसेच, हैदराबादमधील मौलाना आझाद नॅशनल उर्दु युनिव्हर्सिटी येथेही विद्यार्थ्यांनी जामिया येथील विद्यार्थ्यांना समर्थन देत आंदोलन सुरू केलं आहे.  जामिया विश्वविद्यालयाजवळ हिंसात्मक घटन घडल्या आहेत. या घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत, पण दिल्लीमध्ये याची सर्वाधिक धग जाणवत आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याऐवजी हिंसा भडकवण्याचं काम केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी केला आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाAmit Shahअमित शहा