शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

'मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे जनरल डायर बनलेत', आप नेत्याचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 13:12 IST

Aam Aadmi Party leader Raghav Chadha : आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डा यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची तुलना जनरल डायर यांच्याशी केली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलन शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे.शेतकऱ्यांच्या मागणीवर आज तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणामधीलशेतकरी दिल्लीच्या सीमेवर बऱ्याच दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनदरम्यान पाऊस आणि कडाक्याच्या थंडीतही शेतकरी रस्त्यावर आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डा यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची तुलना जनरल डायर यांच्याशी केली आहे.

वृत्तसंस्था एएनआयशी राघव चड्डा यांनी बातचीत केली. यावेळी मनोहर लाल खट्टर यांनी जनरल डायर यांच्यासारखे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्याचे आणि गोळीबार करण्याचे आदेश दिले आहेत, असे राघव चड्डा म्हणाले. तसेच, देशातील शेतकरी आपले शत्रू आहेत का? ते चीन किंवा पाकिस्तान लष्कराचे जवान आहेत का? त्याच्याशी असे का वागले जात आहे? असे सवाल राघव चड्डा यांनी केले आहेत.

नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हळूहळू तीव्र होत आहे. रविवारी शेतकऱ्यांनी पोलिसांचे बॅरिकेडिंग तोडून दिल्लीच्या दिशेने पुढे आले. त्यानंतर दिल्ली-जयपूर महामार्गावरील मसानी गावाजवळ पोलीस आणि शेतकर्‍यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी पुढे जाण्यावर ठाम होते. त्याचवेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून अश्रुधुराचा वापर केला.

दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलन शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीवर आज तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, आजच्या बैठकीतून तोडगा निघेल आणि तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन लवकरच संपेल, अशी आशा केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत बैठकीच्या सहा फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तीन कृषी कायद्यांबाबत सरकार व शेतकरी यांच्यात सुरू असलेली चर्चा अद्याप संपलेली नाही. सप्टेंबरमध्ये संसदेने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटना ठाम आहेत. सरकारचे म्हणणे आहे की या कायद्यांमुळे कृषी क्षेत्र सुधारेल आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल. नवीन कृषी कायद्यांमुळे एमएसपी आणि मंडई व्यवस्था कमकुवत होईल, अशी भीती शेतकरी संघटनांना वाटत आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीAAPआपHaryanaहरयाणा