शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे प्रकल्पाचा दोन चिनी कंपन्यांचा ठेका रद्द, चीनला आणखी एक झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 07:23 IST

नवी दिल्ली : सीमेवरील तणाव निवळल्यानंतर भारत सरकारकडून चीनला आर्थिक झटके दिले जात आहेत. दोन चिनी कंपन्यांना देण्यात आलेला ...

नवी दिल्ली : सीमेवरील तणाव निवळल्यानंतर भारत सरकारकडून चीनला आर्थिक झटके दिले जात आहेत. दोन चिनी कंपन्यांना देण्यात आलेला दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या कामाचा ठेका रद्द करण्यात आला आहे. या कंपन्यांना ‘लेटर आॅफ अवॉर्ड’ देण्यास भारतीय अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. हे काम आता दुसºया क्रमांकाची सर्वांत कमी बोली असलेल्या कंपन्यांना दिले जाईल.

उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, चिनी कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी घोषणा राजमार्ग व रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच केली होती. त्यानुसार, ही कारवाई आहे. हा ठेका ८०० कोटी रुपयांचा होता. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या दोन टप्प्यांशी संबंधित हा ठेका आहे. या दोन्ही कंपन्या जिगांक्सी कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंगच्या उपकंपन्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, या दोन्ही कंपन्यांनी बोली जिंकली होती, तरीही त्यांना ‘लेटर आॅफ अवॉर्ड’ देण्यात आलेले नाही.

राजमार्ग व रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी चिनी कंपन्यांना राजमार्ग प्रकल्पांतून बाहेर काढले जाईल, अशी घोषणा केली होती. चिनी कंपन्यांना संयुक्त उद्यम भागीदार (जेव्ही) म्हणूनही काम करू दिले जाणार नाही, असे गडकरी यांनी म्हटले होते. गेल्या महिन्यात भारत-चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांतील सैनिकांत संघर्ष झडला होता. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. यानंतर दोन्ही देशांत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या संघर्षानंतर भारतात चीनविरोधात तीव्र असंतोषाचे वातावरण तयार झाले. चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम लोकांनी स्वयंस्फूर्तीने सुरू केली.२० टक्के काम पूर्णयापूर्वी भारतीय रेल्वेने एका चिनी कंपनीला दिलेला ४७१ कोटी रुपयांचा सिग्नलिंग यंत्रणेचा ठेका रद्द केला आहे. हा ठेका बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिझाईन इन्स्टिट्यूट अँड टेलिकम्युनिकेशन नेटवर्कला मिळाला होता. ही कंपनी कानपूर ते दीनदयाल उपाध्यायनगर या ४१७ कि.मी. टप्प्यावर काम करीत होती. कंपनीने सुमारे २० टक्के काम पूर्णही केले होते. हे काम आता या कंपनीकडून काढून घेण्यात आले.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन