शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

Delhi MCD Result: दिल्लीतील एका जागेवर AAP-BJPमध्ये झाली 'टाय', आला नवा ट्विस्ट; कोण जिंकलं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 15:32 IST

दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांचे आज निकाल समोर आले आहेत.

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या (MCD) निवडणुकांचे आज निकाल समोर आले. यामध्ये एक्झिट पोलप्रमाणे 'आप'नेभाजपाला 15 वर्षांच्या सत्तेतून बेदखल केले आहे. आप बहुमताने सत्तेत आली आहे. असे असले तरी भाजपाने आपला जबरदस्त टक्कर दिली आहे. दिल्ली जिंकली तरी आपला मतांच्या गणितात मार खावा लागला आहे. एवढा की उद्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव देखील पत्करावा लागू शकतो. काँग्रेसबद्दल भाष्य करायचे झाले तर पक्षाची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. आम आदमी पार्टीने 134 तर भारतीय जनता पक्षाने 104 जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसने 9 जागा जिंकल्या आहेत. मात्र मलका गंजमधील जागेच्या निकालाने सगळ्यांचेच लक्ष वेधले. 

फेरमतमोजणीत भाजपच्या उमेदवाराने मारली बाजी दरम्यान, दिल्लीतील मलका गंजमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पार्टीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. खरं तर इथे दोन्हीही पक्षातील उमेदवारांना समान मतं मिळाली. प्रथम मोजणीत दोघांनाही 10035, 10035 अशी मते मिळाली. नंतर फेरमतमोजणी झाली, त्यात भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. भाजपकडून रेखा येथे रिंगणात होत्या. दुसरीकडे गुड्डी देवी जाटव या आम आदमी पक्षाकडून उमेदवार होत्या. सुरुवातीपासूनच दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होती. कधी मोजणीत रेखा यांनी आघाडी घेतली तर कधी गुड्डी यांनी विजयाकडे कूच केली. मात्र फेरमतमोजणीत भाजपच्या रेखा 482 मतांनी विजयी झाल्या आहेत. रेखा यांना १३,८५५ तर गुड्डी देवी जाटव यांना १३,३७३ मते मिळाली.

खरं तर 'आप'ला दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत 42 टक्के मते मिळाली आहेत. परंतु, विधानसभेला 53.57 टक्के मते मिळाली होती. म्हणजेच आपने दोन वर्षांत आपने तब्बल 11 टक्के मते गमावली आहेत. आजचा विजय आपला जल्लोष करण्यासाठी पुरेसा असला तरी केजरीवालांना टेन्शन देण्यासाठी देखील पुरून उरणारा आहे.  

'आप'च्या मतात घटनिवडणूक आयोगानुसार आपला दिल्लीत 42.35 टक्के, भाजपाला 39.23 टक्के आणि काँग्रेसला 12.6 टक्के मते मिळाली. अपक्ष उमेदवारांना 2.86 टक्के मते मिळाली. बसपाला 1.65 टक्के मते मिळाली. जर 2020 मध्ये झालेल्या विधानसभेचा विचार केला तर भाजपाने तेव्हा 38.51 टक्के मते आणि काँग्रेसने 4.26 टक्के मते मिळविली होती. दोन्ही निवडणुकांत मतदानाची टक्केवारी जवळपास समानच होती, मग आपची 11 टक्के मते गेली कुठे? भाजपाला 0.72 टक्के मते जास्त मिळाली आहेत. तर काँग्रेसला 7.9 टक्के मते अधिक मिळाली आहेत. 'आप'ने भलेही जागांमध्ये भाजपाला मात दिलेली असली तरी मतांच्या गणितात तोटा झाला आहे. आणखी तीन वर्षांनी ही जादाची मते वाढली तर आपची सत्ता कमी अधिक फरकाने जाण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेस