शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल 177 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर, समर्थकांकडून जोरदार स्वागत; म्हणाले- यांचे कारागृहदेखील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 19:11 IST

न्यायालयाच्या निर्णयानंतर, आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अखेर 177 दिवसांनंतर तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर, आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत.

156 दिवस कारागृहात..., 177 दिवसांनंतर जामीन... -खरे तर, अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. यावर, 10 दिवसांच्या चौकशीनंतर त्यांना 1 एप्रिलला तिहार तुरुंगात पाठवण्यात आले होते. यानंतर 10 मेरोजी त्यांना 21 दिवसांसाठी सार्वत्रिक निवडणुकीत प्रचार करण्यासाठी सोडण्यात आले होते. निवडणुकीनंतर 2 जूनला त्यांनी पुन्हा तिहार कारागृहात सरेंडर केले होते. ही 21 दिवसांची सुटका वगळल्यास केजरीवाल एकूण 156 दिवस कारागृहात राहिले आहेत. पण त्यांना खऱ्या अर्थाने जामीन 177 दिवसांनंतर मिळाला आहे.

AAP कार्यकर्त्यांना केलं संबोधित -कारागृहातून बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, माझ्यासाठी लाखो लोकांनी प्रार्थना केली होती. त्यांच्या प्रार्थनेमुळे आज बाहेर आलो आहे. यांचे कारागृहदेखील केजरीवालचे मनोबल तोडू शकले नाही. 

केजरीवाल पुढे म्हणाले, "मी इश्वराकडे प्रार्थना करतो की, त्याने मला आतापर्यंत जशी शक्ती दिली, त्याच पद्दतीने तो मला मार्ग दाखवत राहो. मी देशाची सेवा करत राहो आणि देशात फूट पाडण्याऱ्या, तसेच देशाला कमकुवत करणाऱ्या देशविरोधी शक्तींविरोधात मी आयुष्यभर लढत राहो. जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्जल भुइयां यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांच्या जामिनावर निर्णय सुनावला आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीjailतुरुंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय