शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

केजरीवाल 177 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर, समर्थकांकडून जोरदार स्वागत; म्हणाले- यांचे कारागृहदेखील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 19:11 IST

न्यायालयाच्या निर्णयानंतर, आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अखेर 177 दिवसांनंतर तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर, आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत.

156 दिवस कारागृहात..., 177 दिवसांनंतर जामीन... -खरे तर, अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. यावर, 10 दिवसांच्या चौकशीनंतर त्यांना 1 एप्रिलला तिहार तुरुंगात पाठवण्यात आले होते. यानंतर 10 मेरोजी त्यांना 21 दिवसांसाठी सार्वत्रिक निवडणुकीत प्रचार करण्यासाठी सोडण्यात आले होते. निवडणुकीनंतर 2 जूनला त्यांनी पुन्हा तिहार कारागृहात सरेंडर केले होते. ही 21 दिवसांची सुटका वगळल्यास केजरीवाल एकूण 156 दिवस कारागृहात राहिले आहेत. पण त्यांना खऱ्या अर्थाने जामीन 177 दिवसांनंतर मिळाला आहे.

AAP कार्यकर्त्यांना केलं संबोधित -कारागृहातून बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, माझ्यासाठी लाखो लोकांनी प्रार्थना केली होती. त्यांच्या प्रार्थनेमुळे आज बाहेर आलो आहे. यांचे कारागृहदेखील केजरीवालचे मनोबल तोडू शकले नाही. 

केजरीवाल पुढे म्हणाले, "मी इश्वराकडे प्रार्थना करतो की, त्याने मला आतापर्यंत जशी शक्ती दिली, त्याच पद्दतीने तो मला मार्ग दाखवत राहो. मी देशाची सेवा करत राहो आणि देशात फूट पाडण्याऱ्या, तसेच देशाला कमकुवत करणाऱ्या देशविरोधी शक्तींविरोधात मी आयुष्यभर लढत राहो. जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्जल भुइयां यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांच्या जामिनावर निर्णय सुनावला आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीjailतुरुंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय