शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

केजरीवाल 177 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर, समर्थकांकडून जोरदार स्वागत; म्हणाले- यांचे कारागृहदेखील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 19:11 IST

न्यायालयाच्या निर्णयानंतर, आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अखेर 177 दिवसांनंतर तिहार तुरुंगातून बाहेर आले आहेत. दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर, आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण आनंद व्यक्त करत आहेत.

156 दिवस कारागृहात..., 177 दिवसांनंतर जामीन... -खरे तर, अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. यावर, 10 दिवसांच्या चौकशीनंतर त्यांना 1 एप्रिलला तिहार तुरुंगात पाठवण्यात आले होते. यानंतर 10 मेरोजी त्यांना 21 दिवसांसाठी सार्वत्रिक निवडणुकीत प्रचार करण्यासाठी सोडण्यात आले होते. निवडणुकीनंतर 2 जूनला त्यांनी पुन्हा तिहार कारागृहात सरेंडर केले होते. ही 21 दिवसांची सुटका वगळल्यास केजरीवाल एकूण 156 दिवस कारागृहात राहिले आहेत. पण त्यांना खऱ्या अर्थाने जामीन 177 दिवसांनंतर मिळाला आहे.

AAP कार्यकर्त्यांना केलं संबोधित -कारागृहातून बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, माझ्यासाठी लाखो लोकांनी प्रार्थना केली होती. त्यांच्या प्रार्थनेमुळे आज बाहेर आलो आहे. यांचे कारागृहदेखील केजरीवालचे मनोबल तोडू शकले नाही. 

केजरीवाल पुढे म्हणाले, "मी इश्वराकडे प्रार्थना करतो की, त्याने मला आतापर्यंत जशी शक्ती दिली, त्याच पद्दतीने तो मला मार्ग दाखवत राहो. मी देशाची सेवा करत राहो आणि देशात फूट पाडण्याऱ्या, तसेच देशाला कमकुवत करणाऱ्या देशविरोधी शक्तींविरोधात मी आयुष्यभर लढत राहो. जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्जल भुइयां यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांच्या जामिनावर निर्णय सुनावला आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीjailतुरुंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय