शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

अरविंद केजरीवालांनी 'त्या' विषाचे नाव सांगावे, यमुनेच्या वादावर अमित शाहांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 18:24 IST

Delhi Elections 2025: अरविंद केजरीवालांनी भाजपवर यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला आहे.

Delhi Assembly Elections 2025: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी गुरुवारी (30 जानेवारी 2025) दिल्लीतील रोहिणी येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 'निवडणूक जिंकण्यासाठी खोटे बोलणे थांबवा, असे केजरीवालांना सांगण्यासाठी मी आलो आहे. दिल्लीतील जनतेला त्रास देण्यासाठी भाजपने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचे बिनबुडाचे आरोप केजरीवाल करतात,' अशी टीकाही शाहांनी केली. 

अमित शाहा पुढे म्हणतात, 'केजरीवालजी, भाजपने विष मिसळल्याचा आरोप करता. कोणते विष मिसळले आहे? त्याचे नाव काय? कोणत्या प्रयोगशाळेने त्याची चाचणी केली आहे? हे तुम्ही सांगा. तुम्ही दुसरा आरोप करता की, आम्ही यमुनेचे पाणी रोखले. आम्ही हे पाणी रोखले असते, तर गावांमध्ये पूर आला असता. कोणत्या गावात पूर आला, हे तुम्हा सांगा. दिल्लीतील आप सरकारनेच यमुना प्रदूषित करून दिल्लीकरांना दूषित पाणी पिण्यास भाग पाडले आणि दिल्ली जल बोर्डात भ्रष्टाचार केला,' असा आरोपही शाहांनी केला.

दिल्लीत परिवर्तनाची लाटयावेळी शाहांनी आम आदमी पक्षावर (आप) भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आणि दिल्लीत भाजपच्या बाजूने परिवर्तनाची लाट असल्याचा दावा केला. अमित शाहा म्हणाले की, 'अरविंद केजरीवाल खोटे बोलण्यात आणि बहाण्यांमध्ये नंबर 1 आहेत. आप लबाडी आणि फसवणूक करणारा पक्ष आहे. केजरीवालांनी निवासी भागात दारुबंदी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दारुची दुकाने उघडली. शाळा, मंदिरांसमोरही दारूची दुकाने उघडण्यात आली.' 

'त्यांनी यमुनेला लंडनच्या थेम्स नदीप्रमाणे बनवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत त्यांनी स्वतः त्यात कधीच डुबकी मारली नाही. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने यमुनेवर विषप्रयोग केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. 2010-11 च्या अण्णांच्या आंदोलनावेळी केजरीवाल यांनी राजकीय पक्ष काढणार नसल्याचे सांगितले होते, मात्र अण्णा हजारे राळेगावातही पोहोचले नव्हते अन् त्यांनी 'आप'ची स्थापना केली. केजरीवालांना बंगला कमी पडला, त्यानंतर त्यांनी काचेचा महाल बांधला आणि त्यात सोन्याचे कमोड बसवले. आता दिल्लीत परिवर्तन नक्की होणार. भाजपची सत्ता आल्यावर दिल्लीला देशातील नंबर 1 राज्य बनवणार,' असे आश्वासन शाहांनी यावेळी दिले. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाdelhi electionदिल्ली निवडणूक