शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

'...मग काँग्रेसनं आपलं दुकान बंद करायचं का?'; दिल्लीतील 'भोपळ्या'वरून नेत्यांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 12:18 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसमध्ये अफरातफर माजली आहे.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भोपळाही फोडता न आलेल्या काँग्रेसमध्ये अफरातफर माजली आहे. काँग्रेसच्या पार्टीच्या 63 उमेदवारांचं या निवडणुकीत डिपॉझिटही जप्त झालं. या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अरविंद केजरीवालांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शर्मिष्ठा मुखर्जींनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्ली निवडणूक प्रभारी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीसी चाको यांनी आपच्या उदयानंतर काँग्रेसला आपले मतदार परत मिळवता आलेले नसल्याचं म्हणत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपच्या विजयानंतर काँग्रेसला झालेल्या आनंदावर निशाणा साधला आहे. पी. चिदंबरम यांच्या ट्विटला रिट्विट करत शर्मिष्ठा म्हणाल्या, काँग्रेसनं आपलं दुकान बंद करून टाकलं पाहिजे काय?. त्यामुळे काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी झालेली आहे. शर्मिष्ठा पी. चिदंबरम यांचं ट्विट रिट्विट करत म्हणाल्या, सर, काँग्रेस पक्ष भाजपाला हरवण्यासाठी इतर प्रादेशिक पक्षांचं आऊटसोर्सिंग करत आहेत का?, जर तसं करत नसल्यास पराभवाचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी आपच्या विजयाचा आनंद साजरा का करत आहे? आणि जर असंच सुरू राहणार असल्यास आपण आपलं दुकान बंद केलं पाहिजे. शर्मिष्ठा मुखर्जींनी पी. चिदंबरम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ''आत्मपरीक्षण खूप झालं, आता कारवाई करा''तत्पूर्वी मंगळवारी शर्मिष्ठा यांनी काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले होते. भाजपा ध्रुवीकरणाचं, तर केजरीवाल स्मार्ट राजकारण करत आहेत. मग आपण काय करत आहोत?, काँग्रेसला दिल्लीत एकही जागा मिळाली नसल्यानं शर्मिष्ठा नाराज झाल्या आहेत. आपण दिल्लीत पुन्हा एकदा हरलो आहोत. आत्मपरीक्षण खूप झालं, आता कारवाई झाली पाहिजे. उच्च स्तरावरून निर्णय घेण्यास होणारा विलंब, रणनीतीचा अभाव आणि राज्यस्तरावर एकजूट नसणे, कार्यकर्त्यांचा निरुत्साह, तळागाळातील संवादाचा अभाव ही पराभवाची कारणे आहेत. मी माझी जबाबदारी स्वीकारते, असंही शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी