शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Delhi Election Results: वर्मा, लेखी, हर्षवर्धन यांच्या लोकसभा मतदारसंघात भाजपला 'भोपळाच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 15:28 IST

भारतीय जनता पक्षाचे खासदार परवेश वर्मा, मीनाक्षी लेखी आणि डॉ. हर्षवर्धन यांच्या मतदारसंघात भाजपला 30 पैकी एकही जागा जिंकता आली नाही.

नवी दिल्ली : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रचार करून विजयाची स्वप्न पाहणाऱ्या भाजपसाठी निवडणुकीचा निकाल धक्कादायक ठरला आहे. आठ महिन्यांपूर्वी दिल्लीतील लोकसभा निवडणुकीत सातही जागा जिंकणाऱ्या भाजपला विधानसभा निवडणुकीत 60 पैकी फक्त 8 उमेदवार निवडून आणता आले आहे. तर भाजपाची अवस्था अशी झाली की, तीन लोकसभा मतदारसंघात त्यांना खातेही उघडता आले नाही.

भारतीय जनता पक्षाचे खासदार परवेश वर्मा, मीनाक्षी लेखी आणि डॉ. हर्षवर्धन यांच्या मतदारसंघात भाजपला 30 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी खासदार परवेश वर्मा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते. वर्मा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवाल यांना 'दहशतवादी' म्हटले होते.

परवेश वर्मा हे पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणून आले आहेत. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी 10 जागा होत्या. या जागा मडीपूर, जनकपुरी, द्वारका, राजौरी गार्डन, विकासपुरी, हरिनगर, उत्तम नगर, नजफगड, मटियाला आणि टिळक नगर आहेत. मात्र या 10 जागांवर भाजपला एकही जागा जिंकता आली नाही.

त्याचप्रमाणे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या मीनाक्षी लेखी नवी दिल्ली मतदारसंघातून विजयी झाल्या आहे. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात सुद्धा 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्यात ककरोल बाग, राजेंद्र नगर, मालवीय नगर, पटेल नगर, नई दिल्‍ली, आरके पुरम, मोती नगर, कस्‍तूरबा नगर, ग्रेटर कैलाश और दिल्‍ली कैंट या मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र आपच्या लाटेसमोर मीनाक्षी लेखी यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही.

चांदनी चौक लोकसभा मतदारसंघात सुद्धा भाजपचे डॉ. हर्षवर्धन खासदार म्हणून निवडणून आले असून, त्यांच्या मतदारसंघात सुद्धा 10 विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यात आदर्श नगर, शालीमार बाग, शकूर बस्ती, त्रिनगर, वजीरपुर, मॉडल टाउन, सदर बजार, चांदनी चौक, मटियामहल और बल्लीमारान या मतदारसंघाचा समावेश आहे. तर या दहा जागांपैकी भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही. आम आदमी पक्षाने या सर्व जागा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.