शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Delhi Election Result: दिल्लीतील दारुण पराभवानंतर भाजपाध्यक्षांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 18:02 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठी प्रचारयंत्रणा कामाला लावूनही भाजपाला दोन आकडी जागा जिंकता आलेल्या नाहीत.

ठळक मुद्देमतदारांनी दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करतोआम्ही दिल्लीमध्ये जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावूअरविंद केजरीवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत प्रचंड शक्ती पणाला लावूनही भाजपाला दोन आकडी जागा जिंकता आलेल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दिल्लीतील जनतेने दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करत असून, राज्यात भाजपा जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, असे नड्डा यांनी सांगितले. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलांनुसार आम आदमी पक्षाने ६३ जागांवर कब्जा केला असून, भाजपाला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रिय नेतृत्वासमोर निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने अवलंबलेली रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली. या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना नड्डा म्हणाले की, ''आम्ही आपला पराभव मान्य करतो. मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो. आम्ही दिल्लीमध्ये जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावू. दिल्लीच्या विकासासंबंधीचे मुद्दे आम्ही वेळोवेळी उपस्थित करू. तसेच आम आदमी पक्ष दिल्लीतील जनतेचा विकास करेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयासाठी अरविंद केजरीवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.'' 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मोठी प्रचारयंत्रणा उतरवली होती. भाजपाचे केंद्र आणि विविध राज्यातील दिग्गज नेते प्रचारात उतरले होते. मात्र एवढ्या मेहनतीनंतरही आपला रोखणे भाजपाला शक्य झाले नाही. भाजपाने प्रचारात उपस्थित केलेल्या भावनिक मुद्द्यांपेक्षा अरविंद केजरीवाल यांनी केलेला विकासाभिमुख प्रचार मतदारांना भावला. परिणामी भाजपाचा दारुण पराभव झाला.

 

टॅग्स :BJPभाजपाdelhi electionदिल्ली निवडणूकPoliticsराजकारण