शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेश वर्मांच्या मार्गात अडथळा! निकालानंतर 'या' भाजप आमदाराने केला मुख्यमंत्रीपदाचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:23 IST

Delhi Election Result : आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश साहिब सिंह वर्मा यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. 

Delhi Election Result : नवी दिल्ली : तब्बल २७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भाजपानेदिल्लीतआपला विजय नोंदवला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. भाजपच्या दणदणीत विजयानंतर आता दिल्लीत मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजपमध्ये अनेक मोठे चेहरे आहेत. आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश साहिब सिंह वर्मा यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. 

अशातच पाच वेळा आमदार राहिलेले मोहन सिंह बिष्ट यांनी अप्रत्यक्षपणे स्वत: मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. एबीपी न्यूजशी खास संवाद साधताना मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर मोहन सिंग बिष्ट म्हणाले, "मी सहा वेळा जिंकलो आहे, माझी प्रोफाईल मुख्यमंत्री होण्याइतकी आहे. मात्र, मुख्यमंत्रीपद हे वरच्या स्तरावर ठरवले जाईल, परंतू किमान मी प्रोटेम स्पीकर तरी होईन. मीच आमदारांना शपथ देईन."

दरम्यान, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रवेश साहिब सिंह वर्मा, मनोज तिवारी आणि वीरेंद्र सचदेवा यांसारखे चेहरांचा समावेश आहे. प्रवेश साहिब सिंह वर्मा यांचा दावा अधिक मजबूत मानला जात आहे. त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी २०१३, २०१५ आणि २०२० मध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून विजय मिळवला होता.

मोहन सिंह बिष्ट कोण आहेत?मोहन सिंह बिष्ट हे करावल नगरमधून पाच वेळा आमदार राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत पक्षाने मोहन सिंग बिष्ट यांना करावल नगरऐवजी मुस्तफाबादमधून उमेदवारी दिली. यावर मोहन सिंग बिष्ट यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, नंतर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपने करावल नगरमधून कपिल मिश्रा यांना तिकीट दिले. मोहन सिंग बिष्ट यांना २०१५ मध्येच पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा कपिल मिश्रा यांनी आपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि मोहन सिंग बिष्ट यांचा पराभव केला होता. नंतर कपिल मिश्रा हे भाजपमध्ये सामील झाले.

प्रवेश वर्मा यांनी घेतली अमित शाह यांची भेट!प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी शनिवारी निवडणूक जिंकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्रीपदासंदर्भात चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. तत्पूर्वी, निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी वर्मा यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. तसेच, भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा प्रवेश साहिब सिंह वर्मा असणार का? असा सवालही विचारला होता.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपाdelhiदिल्ली