शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार? रामदास आठवलेंनी केली भविष्यवाणी! राहुल गांधींवरही निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 20:53 IST

आठवले म्हणाले, ‘‘राहुल गांधी म्हणतात की, आम्ही सत्तेत आलो तर, असे करू. आपण सत्तेत येण्याचा प्रश्नच नाही. आपल्यासाठी पुढील 25 वर्षे सत्तेत येणे फार अवघड आहे. जोवर मोदीजी आणि मी सोबत आहोत, हे असंभव आहे.’’

केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी काँग्रेस पक्षासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही. तसेच, पुढील २५ वर्षे काँग्रेससाठी पुन्हा सत्तेत येणे अवघड असेल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

आठवले म्हणाले, ‘‘राहुल गांधी म्हणतात की, आम्ही सत्तेत आलो तर, असे करू. आपण सत्तेत येण्याचा प्रश्नच नाही. आपल्यासाठी पुढील 25 वर्षे सत्तेत येणे फार अवघड आहे. जोवर मोदीजी आणि मी सोबत आहोत, हे असंभव आहे.’’

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत ते म्हणाले, राहुल गांधी दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रयत्न करत आहेत. मात्र काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही. राहुल गांधी अजूनही म्हणत आहेत की, 'संविधान खतरे में है', पण संविधान धोक्यात नाही.

आठवले म्हणाले, "संविधान बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही. मात्र, संविधानाने नवे कायदे तयार करण्याचा अधिकार दिला आहे. संसदेला जुन्या कायद्यांमध्ये संशोधन करण्याचा अधिकार आहे. यामुळे संविधानाला कसलाही धोका नाही आणि राहुल गांधी अशा प्रकारची विधाने करून आपल्याच पक्षाचे नुकसान करत आहेत. 

राहुल गांधींवर निशाना -केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान मजबूत करत आहेत. तर राहुल गांधी आणि इतर लोक संविधानासंदर्भात राजकीय अपप्रचार करत आहेत. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा काढून टाकण्यासंदर्भात आणि जातनिहाय जनगणनेसंदर्भात विचारले असता, ते म्हणाले, "राहुल गांधींना माझा प्रश्न आहे की, आपले सरकार इतकी वर्षें सत्तेत असताना आपण ही मर्यादा का नाही वाढवली? आपले सरकार तर २०१४ पर्यंत सत्तेत होते. आपण ते वाढवले ​​नाही. तोपर्यंत आपण इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) सक्षम केले नाही?’’ 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी