शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Arvind Kejriwal : "कमळाचं बटण दाबू नका, कारण..."; अरविंद केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:15 IST

Delhi Election 2025 And Arvind Kejriwal : निवडणूक रॅलीला संबोधित करताना आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.

विश्वास नगर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी लोकांना ५ फेब्रुवारी रोजी कमळाचं बटण दाबू नका असं म्हटलं आहे. जर असं झालं तर भाजपाचे लोक मोहल्ला क्लिनिक बंद करतील असं त्यांनी म्हटलं  आहे. 

"दिल्लीत 'कामाचं राजकारण' पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय राजधानीतील लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत. जर तुम्ही ५ फेब्रुवारी रोजी झाडू बटणाऐवजी दुसरं कोणतंही बटण दाबलंत तर उत्कृष्ट सरकारी शाळा आणि रुग्णालय (मोहल्ला क्लिनिक) उद्ध्वस्त होतील. तुमच्या आशीर्वादाने, आम्ही निवडणुकीनंतर महिला सन्मान योजना, संजीवनी योजना आणि पुजारी-ग्रंथी सन्मान यासारख्या योजनांवर काम करू."

“झोपडपट्ट्यांना काहीही होणार नाही”

"जर चुकून भाजपा सरकार दिल्लीत सत्तेत आलं, तर ते झोपडपट्ट्या तोडतील, पण जोपर्यंत तुमचा मुलगा केजरीवाल जिवंत आहे तोपर्यंत झोपडपट्ट्यांना काहीही होणार नाही" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.  कृष्णा नगरमधील दुसऱ्या एका जाहीर सभेत ते म्हणाले की, ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीचे लोक ईव्हीएममधील झाडूचं बटण दाबून अरविंद केजरीवाल यांना पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री बनवतील.

"भाजपा आमदार १० वर्षे भांडत राहिले"

अरविंद केजरीवाल म्हणाले की, "विश्वास नगर विकासात मागे राहिलं कारण येथील लोकांनी भाजपा उमेदवाराला आमदार केलं. भाजपाचे आमदार १० वर्षे फक्त आमच्याशीच भांडत राहिले. यावेळी विश्वास नगर हे आपचे आमदार बनवतील. यासोबतच विश्वास नगरमध्ये विकासालाही चालना दिली जाईल." दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपPoliticsराजकारणBJPभाजपाdelhiदिल्ली