शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

“AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री”; अरविंद केजरीवालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 21:48 IST

Delhi Assembly Election 2025: भले २-४ जागा कमी येतील, परंतु, सरकार आम आदमी पक्षाचेच बनेल, हीच दिल्लीकरांची भावना आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Delhi Assembly Election 2025: दिल्लीत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत आहेत. इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकमेकांविरोधात दिल्ली विधानसभा निवडणुका लढत आहे. इंडिया आघाडीतील अन्य पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन दिले आहे. त्यामुळे काँग्रेस एकाकी पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दोघांच्या भांडणाचा फायदा घेण्यासाठी तसेच कमबॅक करण्यासाठी भाजपा कंबर कसून तयारीला लागला आहे. यातच या निवडणुकीत अनेक आश्वासने दिली जात असून, आम आदमी पक्षाचे नवीन सरकार स्थापन झाले की, मनिष सिसोदिया उपमुख्यमंत्री असतील, अशी मोठी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

दिल्ली निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच अरविंद केजरीवाल मैदानात उतरले. अनेक आश्वासने देत पुन्हा विजयी होणार असल्याचा दावा ते करत आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा येऊन दिल्लीकरांना काय काय मोफत देणार, याची यादीच ते मांडत आहेत. तर, भाजपा आणि काँग्रेस आम आदमी पक्षावर आणि आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या रणधुमाळीत अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या नव्या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री

मनिष सिसोदिया आमचे सेनापती आहेत. भावाप्रमाणे असून, प्रिय आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार बनत आहे. दिल्लीकर म्हणत आहेत की, भले २-४ जागा कमी येतील, परंतु, सरकार आम आदमी पक्षाचेच बनेल. दिल्लीत आम आदमी पक्षाचे नवे सरकार स्थापन झाल्यावर मनिष सिसोदिया उपमुख्यमंत्री असतील. तुमचा लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री असेल, तर सगळे अधिकारी फोनवरूनच समस्या, प्रश्न सोडवतील. उपमुख्यमंत्री महोदयांचा फोन उचलणार नाही, अशी हिंमत कोणत्याही अधिकाऱ्यांमध्ये नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ज्या लोकांना वीजबिल शून्यावर यायला हवे असेल, त्यांनी आम आदमी पक्षाला मतदान करावे. वीजबिलाच्या नावाखाली भरपूर पैसे भरायचे असतील त्यांनी भाजपाला मतदान करावे. भाजपावाले मोफत वीज देण्याच्या विरोधात आहेत. भाजपावाले सांगत आहेत की, त्यांचे सरकार आल्यास अनुदान समाप्त करतील. मनिष सिसोदिया यांना तुमच्याकडे सोपवले आहे. जंगपुराचा विकास १० पट अधिक करायचा आहे. जेवढी कामे प्रलंबित आहेत, तेवढी अतिशय वेगाने पूर्ण करायची आहेत, असे सांगत आम आदमी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले.

 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदियाAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआप