शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

“AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री”; अरविंद केजरीवालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 21:48 IST

Delhi Assembly Election 2025: भले २-४ जागा कमी येतील, परंतु, सरकार आम आदमी पक्षाचेच बनेल, हीच दिल्लीकरांची भावना आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Delhi Assembly Election 2025: दिल्लीत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत आहेत. इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकमेकांविरोधात दिल्ली विधानसभा निवडणुका लढत आहे. इंडिया आघाडीतील अन्य पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन दिले आहे. त्यामुळे काँग्रेस एकाकी पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दोघांच्या भांडणाचा फायदा घेण्यासाठी तसेच कमबॅक करण्यासाठी भाजपा कंबर कसून तयारीला लागला आहे. यातच या निवडणुकीत अनेक आश्वासने दिली जात असून, आम आदमी पक्षाचे नवीन सरकार स्थापन झाले की, मनिष सिसोदिया उपमुख्यमंत्री असतील, अशी मोठी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

दिल्ली निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच अरविंद केजरीवाल मैदानात उतरले. अनेक आश्वासने देत पुन्हा विजयी होणार असल्याचा दावा ते करत आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा येऊन दिल्लीकरांना काय काय मोफत देणार, याची यादीच ते मांडत आहेत. तर, भाजपा आणि काँग्रेस आम आदमी पक्षावर आणि आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या रणधुमाळीत अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या नव्या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री

मनिष सिसोदिया आमचे सेनापती आहेत. भावाप्रमाणे असून, प्रिय आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार बनत आहे. दिल्लीकर म्हणत आहेत की, भले २-४ जागा कमी येतील, परंतु, सरकार आम आदमी पक्षाचेच बनेल. दिल्लीत आम आदमी पक्षाचे नवे सरकार स्थापन झाल्यावर मनिष सिसोदिया उपमुख्यमंत्री असतील. तुमचा लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री असेल, तर सगळे अधिकारी फोनवरूनच समस्या, प्रश्न सोडवतील. उपमुख्यमंत्री महोदयांचा फोन उचलणार नाही, अशी हिंमत कोणत्याही अधिकाऱ्यांमध्ये नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ज्या लोकांना वीजबिल शून्यावर यायला हवे असेल, त्यांनी आम आदमी पक्षाला मतदान करावे. वीजबिलाच्या नावाखाली भरपूर पैसे भरायचे असतील त्यांनी भाजपाला मतदान करावे. भाजपावाले मोफत वीज देण्याच्या विरोधात आहेत. भाजपावाले सांगत आहेत की, त्यांचे सरकार आल्यास अनुदान समाप्त करतील. मनिष सिसोदिया यांना तुमच्याकडे सोपवले आहे. जंगपुराचा विकास १० पट अधिक करायचा आहे. जेवढी कामे प्रलंबित आहेत, तेवढी अतिशय वेगाने पूर्ण करायची आहेत, असे सांगत आम आदमी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले.

 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदियाAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआप