शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

“AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री”; अरविंद केजरीवालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 21:48 IST

Delhi Assembly Election 2025: भले २-४ जागा कमी येतील, परंतु, सरकार आम आदमी पक्षाचेच बनेल, हीच दिल्लीकरांची भावना आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Delhi Assembly Election 2025: दिल्लीत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत आहेत. इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकमेकांविरोधात दिल्ली विधानसभा निवडणुका लढत आहे. इंडिया आघाडीतील अन्य पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन दिले आहे. त्यामुळे काँग्रेस एकाकी पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दोघांच्या भांडणाचा फायदा घेण्यासाठी तसेच कमबॅक करण्यासाठी भाजपा कंबर कसून तयारीला लागला आहे. यातच या निवडणुकीत अनेक आश्वासने दिली जात असून, आम आदमी पक्षाचे नवीन सरकार स्थापन झाले की, मनिष सिसोदिया उपमुख्यमंत्री असतील, अशी मोठी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

दिल्ली निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच अरविंद केजरीवाल मैदानात उतरले. अनेक आश्वासने देत पुन्हा विजयी होणार असल्याचा दावा ते करत आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा येऊन दिल्लीकरांना काय काय मोफत देणार, याची यादीच ते मांडत आहेत. तर, भाजपा आणि काँग्रेस आम आदमी पक्षावर आणि आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. या रणधुमाळीत अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या नव्या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

AAP च्या नवीन सरकारमध्ये मनिष सिसोदिया होणार उपमुख्यमंत्री

मनिष सिसोदिया आमचे सेनापती आहेत. भावाप्रमाणे असून, प्रिय आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार बनत आहे. दिल्लीकर म्हणत आहेत की, भले २-४ जागा कमी येतील, परंतु, सरकार आम आदमी पक्षाचेच बनेल. दिल्लीत आम आदमी पक्षाचे नवे सरकार स्थापन झाल्यावर मनिष सिसोदिया उपमुख्यमंत्री असतील. तुमचा लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री असेल, तर सगळे अधिकारी फोनवरूनच समस्या, प्रश्न सोडवतील. उपमुख्यमंत्री महोदयांचा फोन उचलणार नाही, अशी हिंमत कोणत्याही अधिकाऱ्यांमध्ये नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ज्या लोकांना वीजबिल शून्यावर यायला हवे असेल, त्यांनी आम आदमी पक्षाला मतदान करावे. वीजबिलाच्या नावाखाली भरपूर पैसे भरायचे असतील त्यांनी भाजपाला मतदान करावे. भाजपावाले मोफत वीज देण्याच्या विरोधात आहेत. भाजपावाले सांगत आहेत की, त्यांचे सरकार आल्यास अनुदान समाप्त करतील. मनिष सिसोदिया यांना तुमच्याकडे सोपवले आहे. जंगपुराचा विकास १० पट अधिक करायचा आहे. जेवढी कामे प्रलंबित आहेत, तेवढी अतिशय वेगाने पूर्ण करायची आहेत, असे सांगत आम आदमी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले.

 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदियाAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआप