शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, '...तर राजकारणातून संन्यास घेईन'  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 12:53 IST

भाजपाचा पाच पटीने काम करण्याचा दावा

नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीवासीयांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीच्या सरकारने केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर, दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल सरकावर भाजपाने केला आहे. तसेच, पुढील पाच वर्षात केजरीवाल सरकारपेक्षा पाच पटीने जास्त काम करण्याचा दावा भाजपाने केला आहे. 

भाजपाने पुढील पाच वर्षांत केजरीवाल सरकारपेक्षा पाच पटीने अधिक काम दिल्लीतील जनतेसाठी केले नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, असे भाजपाचे दिल्लीतील प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी एका मुलाखतीत सांगितले. शाळा, बेरोजगारांना नोकऱ्या, प्रत्येक नागरिकाला अनुदान दिल्याचा जो काय दावा आम आदमी पार्टीने गेल्या पाच वर्षात केला आहे, त्याच्या  पाच पटीने भाजपा दिल्लीतील जनतेला देईल, असे मनोज तिवारी म्हणाले.

प्रत्येक घरात शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. हवेतील प्रदूषण कमी करू. पाच हजार नवीन इलेक्ट्रॉनिक बसेस याशिवाय सीएनजी बसेससोबत दिल्लीच्या ट्रान्सपोक्ट कनेक्टिव्हिटी चांगली करण्याचे लक्ष्य आहे. दिल्लीत बंद होण्याचा मार्गावर असलेल्या रुग्णालयांसाठी योग्य मार्ग काढण्याच प्रयत्न करण्यात येईल, असे मनोज तिवारी यांनी सांगितले. 

याचबरोबर, यमुना नदीवर रिव्हर फ्रंट तयार केला जाईल. तसेच, ज्याठिकाणी झोपडपट्टी आहे, त्याठिकाणी आवास योजनेच्या माध्यमातून लोकांसाठी घरांची व्यवस्था करण्यात येईल. गॅस, पाण्याचे कनेक्शन आणि शौचालय यांसारख्या सुविधा चांगल्या केल्या जातील, असेही मनोज तिवारी यांनी सांगितले.  

दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसही दिल्लीमधील आपला दुरावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. 

2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता.  

टॅग्स :BJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्ली