शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

अखेरच्या टप्प्यात भाजप सोडून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत केजरीवालांचं काय झालं बोलणं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:20 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आल्याने प्रचाराला वेग आला आहे. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीनंतर दिल्लीच्या अध्यक्षपदाचे भवितव्य ठरणार आहे. अशातच आज आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस समर्थकांना मोठे आवाहन केले. सर्व पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना अरविंद केजरीवालकाँग्रेस समर्थकांना व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काँग्रेसला मत दिल्यास भाजपचा फायदा होईल, असं अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.

काँग्रेस मतदारांना आवाहन करतो की, जर त्यांनी काँग्रेसला मत दिले तर त्याचा एक प्रकारे भाजपलाच फायदा होईल. भाजप आल्यास आमच्याकडून तुम्हाला मिळणाऱ्या सर्व सुविधा बंद होतील, असा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला. अरविंद केजरीवाल यांनी एका व्हिडीओद्वारे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. काँग्रेस समर्थकांचा उल्लेख करत काही लोक मला खूप दुःखी दिसत होते असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

"मला आज काँग्रेस पक्षाच्या समर्थकांशी बोलायचे आहे. अलीकडे काही लोक मला भेटायला आले. मी त्यांना विचारले की तुम्ही कोणाला मत देणार. त्यांनी काँग्रेसला मत देणार असं म्हटलं. मी त्यांना विचारले की, दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व नसताना तुम्ही त्यांना का मतदान करणार आहात? ते म्हणाले की आम्ही वर्षानुवर्षे काँग्रेसचे बटण दाबतो आणि आता सवय झाली आहे. काँग्रेस आता पूर्वीसारखी राहिली नाही. ते म्हणाले की, काँग्रेसच्या विजयासाठी काँग्रेस समर्थक जेवढे काम करतात, तेवढेच पक्षाचे नेते पक्षाचा पराभव करण्यात व्यस्त आहेत. ते म्हणाले की, दिल्लीत काँग्रेसचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे 'आप'ला कोणत्याही प्रकारे पराभूत करणे. काँग्रेस दिल्लीत एकही जागा जिंकण्यासाठी लढत नाहीये. ते फक्त 'आप'ला हरवण्यासाठी भाजपशी लढत आहेत. काँग्रेस नेते भाजपच्या नेत्यांविरोधात काहीही बोलत नाहीत तर फक्त 'आप'च्या नेत्यांविरोधात बोलतात. मी त्यांना सांगितले की त्यांनी काँग्रेसला मत दिल्यास भाजपचा फायदा होईल," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

निवडणूक आयोगाला राजकारण करायचे असेल तर निवडणूक लढवा - अरविंद केजरीवाल 

अरविंद केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर निशाणा साधला. यापूर्वी त्यांनी हरियाणा सरकार यमुना नदीत विषप्रयोग करत असल्याचा दावा केला होता. या विधानावर निवडणूक आयोगाने त्यांचे उत्तर मागितले होते. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांनी वापरलेली भाषा निवडणूक आयोगाचे काम नाही. त्यांनी दिल्लीतील एखाद्या जागेवरून निवडणूक लढवावी. येत्या दोन दिवसांत ते मला अटक करणार आहेत, हे मला माहीत आहे. पण मी घाबरत नाही, असं म्हटलं.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेस