शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

दिल्लीमध्ये भाजपा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न देताच लढणार, रणनीती की अपरिहार्यता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 23:50 IST

Delhi Assembly Election 2025:

दहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर देशातील बहुतांश राज्यात आपली सत्ता प्रस्थापिक केली आहे. मात्र देशाच्या राजधानीचं क्षेत्र असलेल्या दिल्लीमध्ये भाजपालाआपलं सरकार सत्तेत आणता आलेलं नाही. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव केला होता. त्या पार्श्वभूमीवर २०२५ च्या सुरुवातीला होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न देण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याची चर्चा आहे.

केंद्रातील सत्ता मिळवली तरी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीची सत्ता मात्र भाजपाला तब्बल १९९८ पासून मिळवता आलेली नाही. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा दिल्लीत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र तेव्हा भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी काही जागा कमी पडल्या होत्या. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यासह सरकार स्थापन केलं होतं. तर २०१५ आणि २०२० मध्ये आम आदमी पक्ष निर्विवाद विजय मिळवून दिल्लीच्या सत्तेत आला होता.

मागच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने दिल्लीत प्रत्येक चाल खेळून पाहिली आहे. पण त्यांना यश आलेलं नाही. २०१५ मध्ये किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करून भाजपाने निवडणूक लढवली होती, पण त्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. तसेच किरण बेदी ह्याही पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर २०२० मध्ये भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे न करता मोदींच्या नेतृत्वाच्या नावावर निवडणूक लढवून पाहिली. मात्र त्यातही भाजपाला अपयश आले.

आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्यासमोर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न देता निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविना लढण्याचा भाजपाचा निर्णय हा एका विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीचा भाग असल्याचं बोललं जात आहे. सद्यस्थितीत दिल्लीच्या राजकारणात अरविंद केजरीवाल यांना आव्हान देऊ शकेल, असा लोकप्रिय चेहरा आपल्याकडे नाही, असे भाजपाला वाटत आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात कुठलाही चेहरा समोर न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा समोर करण्याचा विचार भाजपाकडून करण्यात येत आहे.

अरविंद केजरीवाल यांच्यासमोर कुठलाही चेहरा पुढे करण्यापेक्षा मोदींचं नाव आणि त्यांच्या कामावर निवडणूक लढवणं फायदेशीर ठरेल, असं भाजपाच्या नेत्यांना वाटतं. तसेच दुसऱ्या राज्यातून एखादा लोकप्रिय चेहरा आणून त्याच्या नावावर निवडणूक लढवण्याचा विचारही भाजपाने करून पाहिलाय. १९९८ मध्ये काँग्रेसने अशीच खेळी करत शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करून निवडणूक लढवली होती. त्यानंतर शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून जवळपास १५ वर्षे काम पाहिलं होतं. मात्र भाजपाच्या बाबतीत बाहेरून नेतृत्व आणलं गेल्यास अशा नेत्याचे स्थानिक नेत्यासोबत सूर जुळतील का? हाही प्रश्न आहे.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेस