शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

"PM मोदी आणि केजरीवालांमध्ये काही फरक नाही, खोटं बोलण्यात दोघेही सारखेच"; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 08:16 IST

Delhi Assembly Election 2025: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद यांच्यावर हल्लाबोल केला.

Rahul Gandhi vs Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीत पहिली सभा घेतली. पण यावेळी त्यांनी भाजपपेक्षा आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर जास्त टीका केली. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल सारखेच आहेत. दोघेही अदानीबद्दल एक शब्दही बोलत नाहीत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी जसा प्रचार करतात आणि प्रसारमाध्यमांमध्ये एकामागून एक खोटी आश्वासने देतात, तसे केजरीवालही करतात, असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी सोमवारी सीलमपूर विधानसभा मतदारसंघात दिल्ली निवडणुकीतील पहिली सभा घेतली. पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. शीला दीक्षित यांच्या सरकारच्या काळाची आठवण करून देत राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. "अरविंद केजरीवाल आले तेव्हा तुम्हाला आठवत असेल, शीला दीक्षित यांचे सरकार होते. आठवतेय का ती दिल्ली? केजरीवाल आले आणि प्रचार केला की आम्ही दिल्ली स्वच्छ करू, भ्रष्टाचार मिटवू, पॅरिस बनवू, आता काय झाले ते पहा. तुम्हीच बघा, आम्ही बाहेर जाऊ शकत नाही, खूप प्रदूषण आहे. अर्धे लोक आजारी आहेत, कर्करोग वाढत आहे. प्रदूषण वाढत आहे. भाव वाढतच आहेत. ते म्हणाले होते की अरविंद केजरीवाल भ्रष्टाचार नष्ट करतील. तुम्हीच सांगा, केजरीवाल यांनी दिल्लीतील भ्रष्टाचार संपवला का?," अस सवाल राहुल गांधी यांनी केला. 

"नरेंद्र मोदी जसा प्रचार करतात तसाच प्रचार अरविंद केजरीवाल करतात. फारसा फरक नाही. हेच सत्य आहे. तुम्हाला माहिती आहे का, जर कोणी कोणत्याही भारतीयाविरुद्ध हिंसाचार केला, मग त्याची जात-धर्म असो, तर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष तिथे सापडतील. त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. जेव्हा तुम्हाला गरज असेल, तुमच्यावर हिंसाचार होईल तेव्हा आम्ही तिथे उभे राहू," असंही राहुल गांधी म्हणाले.

अरविंद केजरीवालांचा पलटवार

दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला. "आज राहुल गांधी दिल्लीत आले. त्यांनी मला खूप शिवीगाळ केली. पण मी त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही. त्यांची लढाई काँग्रेसला वाचवण्यासाठी आहे, माझी लढाई देश वाचवण्यासाठी आहे," असं अरविद केजरीवाल यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी भाजपवरही आरोप केले होते. "नवी दिल्ली विधानसभेत भाजपची हेराफेरी स्पष्टपणे दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट मते बनवून पैसे, बेडशीट, चष्मा वाटण्याचा हा खेळ सुरू आहे. आज आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेऊन या गैरप्रकारात सहभागी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ हटवण्याची मागणी केली," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसBJPभाजपा