शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

"PM मोदी आणि केजरीवालांमध्ये काही फरक नाही, खोटं बोलण्यात दोघेही सारखेच"; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 08:16 IST

Delhi Assembly Election 2025: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद यांच्यावर हल्लाबोल केला.

Rahul Gandhi vs Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीत पहिली सभा घेतली. पण यावेळी त्यांनी भाजपपेक्षा आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर जास्त टीका केली. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल सारखेच आहेत. दोघेही अदानीबद्दल एक शब्दही बोलत नाहीत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी जसा प्रचार करतात आणि प्रसारमाध्यमांमध्ये एकामागून एक खोटी आश्वासने देतात, तसे केजरीवालही करतात, असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी सोमवारी सीलमपूर विधानसभा मतदारसंघात दिल्ली निवडणुकीतील पहिली सभा घेतली. पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. शीला दीक्षित यांच्या सरकारच्या काळाची आठवण करून देत राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. "अरविंद केजरीवाल आले तेव्हा तुम्हाला आठवत असेल, शीला दीक्षित यांचे सरकार होते. आठवतेय का ती दिल्ली? केजरीवाल आले आणि प्रचार केला की आम्ही दिल्ली स्वच्छ करू, भ्रष्टाचार मिटवू, पॅरिस बनवू, आता काय झाले ते पहा. तुम्हीच बघा, आम्ही बाहेर जाऊ शकत नाही, खूप प्रदूषण आहे. अर्धे लोक आजारी आहेत, कर्करोग वाढत आहे. प्रदूषण वाढत आहे. भाव वाढतच आहेत. ते म्हणाले होते की अरविंद केजरीवाल भ्रष्टाचार नष्ट करतील. तुम्हीच सांगा, केजरीवाल यांनी दिल्लीतील भ्रष्टाचार संपवला का?," अस सवाल राहुल गांधी यांनी केला. 

"नरेंद्र मोदी जसा प्रचार करतात तसाच प्रचार अरविंद केजरीवाल करतात. फारसा फरक नाही. हेच सत्य आहे. तुम्हाला माहिती आहे का, जर कोणी कोणत्याही भारतीयाविरुद्ध हिंसाचार केला, मग त्याची जात-धर्म असो, तर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष तिथे सापडतील. त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. जेव्हा तुम्हाला गरज असेल, तुमच्यावर हिंसाचार होईल तेव्हा आम्ही तिथे उभे राहू," असंही राहुल गांधी म्हणाले.

अरविंद केजरीवालांचा पलटवार

दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला. "आज राहुल गांधी दिल्लीत आले. त्यांनी मला खूप शिवीगाळ केली. पण मी त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही. त्यांची लढाई काँग्रेसला वाचवण्यासाठी आहे, माझी लढाई देश वाचवण्यासाठी आहे," असं अरविद केजरीवाल यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी भाजपवरही आरोप केले होते. "नवी दिल्ली विधानसभेत भाजपची हेराफेरी स्पष्टपणे दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट मते बनवून पैसे, बेडशीट, चष्मा वाटण्याचा हा खेळ सुरू आहे. आज आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेऊन या गैरप्रकारात सहभागी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ हटवण्याची मागणी केली," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसBJPभाजपा