शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

"PM मोदी आणि केजरीवालांमध्ये काही फरक नाही, खोटं बोलण्यात दोघेही सारखेच"; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 08:16 IST

Delhi Assembly Election 2025: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद यांच्यावर हल्लाबोल केला.

Rahul Gandhi vs Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीत पहिली सभा घेतली. पण यावेळी त्यांनी भाजपपेक्षा आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर जास्त टीका केली. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल सारखेच आहेत. दोघेही अदानीबद्दल एक शब्दही बोलत नाहीत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी जसा प्रचार करतात आणि प्रसारमाध्यमांमध्ये एकामागून एक खोटी आश्वासने देतात, तसे केजरीवालही करतात, असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी सोमवारी सीलमपूर विधानसभा मतदारसंघात दिल्ली निवडणुकीतील पहिली सभा घेतली. पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. शीला दीक्षित यांच्या सरकारच्या काळाची आठवण करून देत राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. "अरविंद केजरीवाल आले तेव्हा तुम्हाला आठवत असेल, शीला दीक्षित यांचे सरकार होते. आठवतेय का ती दिल्ली? केजरीवाल आले आणि प्रचार केला की आम्ही दिल्ली स्वच्छ करू, भ्रष्टाचार मिटवू, पॅरिस बनवू, आता काय झाले ते पहा. तुम्हीच बघा, आम्ही बाहेर जाऊ शकत नाही, खूप प्रदूषण आहे. अर्धे लोक आजारी आहेत, कर्करोग वाढत आहे. प्रदूषण वाढत आहे. भाव वाढतच आहेत. ते म्हणाले होते की अरविंद केजरीवाल भ्रष्टाचार नष्ट करतील. तुम्हीच सांगा, केजरीवाल यांनी दिल्लीतील भ्रष्टाचार संपवला का?," अस सवाल राहुल गांधी यांनी केला. 

"नरेंद्र मोदी जसा प्रचार करतात तसाच प्रचार अरविंद केजरीवाल करतात. फारसा फरक नाही. हेच सत्य आहे. तुम्हाला माहिती आहे का, जर कोणी कोणत्याही भारतीयाविरुद्ध हिंसाचार केला, मग त्याची जात-धर्म असो, तर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष तिथे सापडतील. त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. जेव्हा तुम्हाला गरज असेल, तुमच्यावर हिंसाचार होईल तेव्हा आम्ही तिथे उभे राहू," असंही राहुल गांधी म्हणाले.

अरविंद केजरीवालांचा पलटवार

दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला. "आज राहुल गांधी दिल्लीत आले. त्यांनी मला खूप शिवीगाळ केली. पण मी त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही. त्यांची लढाई काँग्रेसला वाचवण्यासाठी आहे, माझी लढाई देश वाचवण्यासाठी आहे," असं अरविद केजरीवाल यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी भाजपवरही आरोप केले होते. "नवी दिल्ली विधानसभेत भाजपची हेराफेरी स्पष्टपणे दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट मते बनवून पैसे, बेडशीट, चष्मा वाटण्याचा हा खेळ सुरू आहे. आज आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेऊन या गैरप्रकारात सहभागी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ हटवण्याची मागणी केली," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसBJPभाजपा