भाजपाला केजरीवालांची भीती का वाटते?, मनीष सिसोदियांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 04:00 PM2020-01-06T16:00:01+5:302020-01-06T16:00:30+5:30

'आम आदमी पार्टीचे सरकार आपल्या कामांचा हिशोब लोकांसमोर घेऊन जात आहे.'

delhi assembly election 2020 why bjp afraid to cm arvind kejriwal now manish sisodia opened the secret | भाजपाला केजरीवालांची भीती का वाटते?, मनीष सिसोदियांनी सांगितलं कारण...

भाजपाला केजरीवालांची भीती का वाटते?, मनीष सिसोदियांनी सांगितलं कारण...

Next

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज घोषणा झाली. आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र, याआधीच राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल यांचे जवळचे सहकारी मनीष सिसोदिया यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. भाजपाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची का भीती वाटते? याचे कारण मनीष सिसोदिया यांनी सांगितले आहे. 

आम आदमी पार्टीचे सरकार आपल्या कामांचा हिशोब लोकांसमोर घेऊन जात आहे. विकास कामावर मतं मागत आहे. सामान्य जनता सरकारच्या कामांवर खूश आहे. याच कारणामुळे भाजपाच्या नेत्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून भीती वाटते, असे मनीष सिसोदिया यांनी सांगितले. 

मनीष सिसोदिया यांनी काल (रविवारी) झालेल्या जनसभेत सुद्धा हेच कारण सांगितले. रविवारी मनीष सिसोदिया यांनी खिचडीपूर, मयूर विहार फेस-2, वेस्ट विनोदनगर, रेल्वे कॉलनी, मंडावली आणि बी ब्लॉक मंडावलीमध्ये जनसभा घेतली. तसेच, प्रत्येक सभेत मनीष सिसोदिया यांनी केजरीवाल सरकारने केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर केले.

दुसरीकडे, दिल्लीतील विकासाच्या नावाखाली आपच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने येथील लोकांच्या डोळ्यात धूळ फेकल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात संबोधित करताना अमित शाह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारवर हल्लाबोल केला. 

केजरीवाल यांनी दिल्लीत 15 लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सांगितले होते. मात्र, हे कॅमेरे कुठे लावले आहेत, याचा शोध दिल्लीतील जनता घेत आहे. वायफाय शोधता-शोधता लोकांच्या फोनमधील बॅटरी संपून जाते. पण, वायफाय काही मिळत नाही, असे सांगत अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीत केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीवासीयांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीच्या सरकारने केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर, दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल सरकावर भाजपाने केला आहे. 

(Delhi Election 2019 : 'आमचे सरकार आल्यास 600 युनिटपर्यंत मोफत वीज देणार')

(दिल्ली भाजपाचा सर्व्हे आला; उडू शकते केजरीवालांच्या आमदारांची झोप)

(चश्मा लावूनही शाळा, महाविद्यालय दिसत नाही; अमित शहा यांचा केजरीवालांना टोला)

Web Title: delhi assembly election 2020 why bjp afraid to cm arvind kejriwal now manish sisodia opened the secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.