शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

दिल्ली विधानसभा : 'या' मतदारसंघाने आतापर्यंत दिले 5 मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 16:19 IST

विधानसभेची स्थापना झाल्यापासून हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा ठरला आहे.

नवी दिल्ली: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत 'नवी दिल्ली' मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे कारण म्हणजे या मतदारसंघाने दिल्लीला आतापर्यंत पाच मुख्यमंत्री दिले आहेत. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

'नवी दिल्ली' विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या दिवंगत नेत्या व माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित ह्या सलग तीनवेळा निवडणूक जिंकल्यावर मुख्यमंत्री राहिल्या होत्या. त्यांनतर अरविंद केजरीवाल हे सुद्धा सलग दोनवेळा याच विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून, ते सुद्धा दोन्ही वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र गेल्या पाच वेळेपासून भाजपला या मतदारसंघात पराभव पाहावा लागला आहे.

विधानसभेची स्थापना झाल्यापासून हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा ठरला आहे. 2008 च्या निवडणुकीपूर्वी या मतदारसंघाचे नाव 'गोल मार्केट' असे होते. 1993 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघातून क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांना उमेदवारी देऊन निवडणूक चुरशीची केली होती. तर आझाद यांनी काँग्रेसचे उमेदवार बृजमोहन यांचा पराभव करत विजय मिळवला होता. मात्र त्यांनतर भाजपला आतापर्यंत एकदाही या मतदारसंघातून उमेदवार निवडून आणता आला नाही.

1998 मध्ये दुसऱ्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शीला दीक्षित यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत शीला दीक्षित यांनी केवळ भाजपच्या कीर्ती आझाद यांचा पराभव केला नाही तर मुख्यमंत्री बनून राज्याच्या राजकारणातही त्यांचे वर्चस्व कायम ठेवले. पुढे या मतदारसंघातून 2003 साली भाजपने कीर्ती आझाद यांची पत्नी पूनम आझाद यांना मैदानात उतरवले, पण त्यांनाही शीला दीक्षितसमोर पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे शीला दीक्षित सलग तीन वेळा निवडून येऊन मुख्यमंत्री सुद्धा राहिल्या.

मात्र 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी दीक्षित यांचा 25,864 मतांनी पराभव केला. त्यांनतर 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून पुन्हा केजरीवाल यांनी विजय मिळवत विधानसभेत बहुमत सिद्ध करत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे सलग पाचवेळा मुख्यमंत्री देणारा हा मतदारसंघ आगामी निवडणुकीत चर्चेचा विषय ठरणार आहे.