शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
4
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
5
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
6
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
7
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
8
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
9
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
10
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
11
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
12
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
13
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
14
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
15
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
16
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
17
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
18
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
19
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
20
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...

दिल्ली विधानसभा : 'या' मतदारसंघाने आतापर्यंत दिले 5 मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 16:19 IST

विधानसभेची स्थापना झाल्यापासून हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा ठरला आहे.

नवी दिल्ली: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत 'नवी दिल्ली' मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे कारण म्हणजे या मतदारसंघाने दिल्लीला आतापर्यंत पाच मुख्यमंत्री दिले आहेत. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

'नवी दिल्ली' विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या दिवंगत नेत्या व माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित ह्या सलग तीनवेळा निवडणूक जिंकल्यावर मुख्यमंत्री राहिल्या होत्या. त्यांनतर अरविंद केजरीवाल हे सुद्धा सलग दोनवेळा याच विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून, ते सुद्धा दोन्ही वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र गेल्या पाच वेळेपासून भाजपला या मतदारसंघात पराभव पाहावा लागला आहे.

विधानसभेची स्थापना झाल्यापासून हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा ठरला आहे. 2008 च्या निवडणुकीपूर्वी या मतदारसंघाचे नाव 'गोल मार्केट' असे होते. 1993 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघातून क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांना उमेदवारी देऊन निवडणूक चुरशीची केली होती. तर आझाद यांनी काँग्रेसचे उमेदवार बृजमोहन यांचा पराभव करत विजय मिळवला होता. मात्र त्यांनतर भाजपला आतापर्यंत एकदाही या मतदारसंघातून उमेदवार निवडून आणता आला नाही.

1998 मध्ये दुसऱ्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शीला दीक्षित यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत शीला दीक्षित यांनी केवळ भाजपच्या कीर्ती आझाद यांचा पराभव केला नाही तर मुख्यमंत्री बनून राज्याच्या राजकारणातही त्यांचे वर्चस्व कायम ठेवले. पुढे या मतदारसंघातून 2003 साली भाजपने कीर्ती आझाद यांची पत्नी पूनम आझाद यांना मैदानात उतरवले, पण त्यांनाही शीला दीक्षितसमोर पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे शीला दीक्षित सलग तीन वेळा निवडून येऊन मुख्यमंत्री सुद्धा राहिल्या.

मात्र 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी दीक्षित यांचा 25,864 मतांनी पराभव केला. त्यांनतर 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून पुन्हा केजरीवाल यांनी विजय मिळवत विधानसभेत बहुमत सिद्ध करत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे सलग पाचवेळा मुख्यमंत्री देणारा हा मतदारसंघ आगामी निवडणुकीत चर्चेचा विषय ठरणार आहे.