शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Kangana Ranaut: कंगनाच्या अडचणीत वाढ! दिल्ली विधानसभेने बजावले समन्स; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 18:49 IST

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना एकामागून एक वादग्रस्त विधाने करत असून, आता दिल्ली विधानसभेने समन्स बजावत हजर राहण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली: बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आली आहे. कंगनाने केलेल्या विधानांवरून संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आता शीख समाजासंदर्भात केलेल्या एका विधानावरून दिल्ली विधानसभेने कंगनाला समन्स बजावले असून, ६ डिसेंबर रोजी एका समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

अलीकडेच देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली. तसा प्रस्तावही केंद्रीय मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे रद्द केल्याचा निर्णय कंगना रणौतला पटला नाही. त्यावर नाराजी व्यक्त करत कंगनाने शेतकरी आंदोलकांना खालिस्तानी दहशतवादी म्हटले होते. यानंतर पुन्हा एकदा कंगनाविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. 

दिल्ली विधानसभेने बजावले समन्स

या वादग्रस्त वक्तव्यानंतर कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून, आता तिला थेट दिल्ली विधानसभेने समन्स बजावले आहे. आमदार राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली समितीने सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत कंगनाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता हजर राहण्यास सांगतिले आहे. राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली शांती आणि सद्भाव संबंधी समितीने कंगनाला समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.   

काय म्हणाली होती कंगना?

पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. यानंतर पुन्हा नवीन वाद निर्माण झाला. खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतीलही, पण एका महिलेला विसरून चालणार नाही. देशाच्या एकमेव महिला पंतप्रधानाने या खलिस्तानींना आपल्या चपलेखाली चिरडले होते. इंदिरा गांधींनी स्वत:च्या जीवाची किंमत देत यांना डासांसारखे चिरडलं आणि देशाचे तुकडे होण्यापासून वाचवले. इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतरही इतक्या दशकांपासून ते त्यांच्या नावाने थरथर कापतात. त्यांना असाच गुरु पाहिजे, असे कंगनाने म्हटले होते.  

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतdelhiदिल्ली