शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 10:38 IST

Delhi Air Pollution : दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होम करण्याचा निर्णय घेतला आहे. ५० टक्के कर्मचारी हे आता त्यामुळे घरून काम करतील असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठकही बोलावली आहे.

बुधवारी पर्यावरण मंत्री गोपाल राय दिल्ली सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतींबाबत संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. बैठकीत वर्क फ्रॉम होम करण्याच्या पद्धती ठरवल्या जातील. जेणेकरून सरकारी कामात अडथळा येणार नाही. 

गेल्या काही दिवसांत दिल्ली एनसीआरमध्ये वायू प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर पोहोचली आहे. जोरदार वाऱ्यांमुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक कमी झाला असला तरी, AQI अजूनही अत्यंत गंभीर श्रेणीत आहे.

बुधवारी सकाळी ६.४५ वाजता देखील दिल्लीत AQI अत्यंत खराब म्हणून नोंदवण्यात आला. द्वारका आणि उत्तम नगरमध्ये सर्वाधिक 388 AQI नोंदवला गेला. याशिवाय जनकपुरीमध्ये ३८४, सुखदेव विहारमध्ये ३८१, अलीपूरमध्ये ३७९, शालीमार बागेत ३७७, रोहिणीमध्ये ३८२, मॉडेल टाऊनमध्ये ३७७ ची नोंद झाली आहे. आजही दिल्लीतील बहुतांश भागात AQI ३०० पेक्षा जास्त आहे.

"कृत्रिम पावसासाठी केंद्राने परवानगी द्यावी"

दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी केंद्र सरकारला प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेजारील राज्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावण्याचं आवाहन केलं होतं. दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी दिल्ली सरकारने वारंवार केलेल्या विनंतीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही ते म्हणाले होते. 

टॅग्स :delhiदिल्लीpollutionप्रदूषण