शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न, सहा महिन्यांनी कारमध्ये तरुणीचा शेवट; २१ वर्षीय पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 16:38 IST

दिल्लीत एका २१ वर्षीय तरुणाने त्याच्या पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह कारमध्ये ठेवून पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

Delhi Crime : राजधानी दिल्लीत रविवारी रात्री एक हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. पत्नीची हत्या करून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. एका पोलिसाला हा तरुणा रस्त्यात दिसला होता. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर त्या पोलिसाने त्याला पकडून चौकशी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपी तरुणाने आपण पत्नीला कारमध्ये मारल्याचे सांगितले. लग्नानंतरही पती-पत्नी दोघेही एकत्र राहत नव्हते अशी माहिती समोर आली आहे.

पश्चिम दिल्लीतील राजौरी गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खुनाची खळबळजनक समोर आली आहे. २१ वर्षीय तरुण पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह कारमध्ये टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यावेळी पोलिसाला आरोपीचे वर्तण संशयास्पद वाटले. पोलीस कर्मचाऱ्याने त्याला पकडून त्याची चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला.

२ सप्टेंबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास ख्याला पोलीस ठाण्यात तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल अजय यांनी राजौरी गार्डन पोलीस स्टेशनला आरोपी तरुणाबद्दल माहिती दिली. गौतम असे या आरोपीचे नाव आहे. तो पोलीस कर्मचारी यांना पाहून पळण्याचा प्रयत्न करत होता. अजय यांनी गौतमला संशयास्पद परिस्थितीत शर्टशिवाय फिरताना पकडले होते. त्याच्याकडे चौकशी केली असता गौतमने सांगितले की, मी माझ्या २० वर्षीय पत्नी मन्या हिची हत्या करून तिचा मृतदेह कारमध्ये टाकला आहे. पोलिसांनी या माहितीच्या आधारे शिवाजी महाविद्यालयाच्या लाल दिव्याजवळ उभ्या असलेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम रघुवीर नगर भागातील रहिवासी असून त्याचा विवाह २० वर्षांच्या मान्यासोबत मार्चमध्ये झाला होता. मान्याचे कुटुंबिय या लग्नासाठी तयार नव्हते. तरीही दोघांनीही घरच्यांच्या संमतीशिवाय लग्न केले. मात्र, लग्नानंतर पती-पत्नी दोघेही आपापल्या कुटुंबासोबत राहत होते आणि दोघेही अधूनमधून भेटत होते. रविवारी गौतम मान्याला भेटायला आला होता. त्यादरम्यान मान्याने गौतमला आपण एकत्र राहू असे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि गौतमने मान्यावर चाकूने अनेक वार करून खून केला.

रात्री १० ते ११ दरम्यान हा सगळा प्रकार घडला. हत्येनंतर गौतम मान्याचा मृतदेह घेऊन फिरत होता आणि त्यानंतर त्याने गाडी शिवाजी महाविद्यालय लावली. त्यानंतर तो गाडीबाहेर पडला आणि तिथून चालत निघाला. त्याचवेळी पोलीस कर्मचाऱ्याने त्याला शर्टाशिवाय पाहिलं आणि त्याच्याकडे चौकशी सुरु केली.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस