शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

दुसऱ्या दिवशीही एअर इंडियाची विमाने विलंबाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 03:31 IST

मुंबईतील सेवेलाही फटका बसून रविवारी ५० पेक्षा जास्त विमानांना विलंब झाला. शनिवारी एअर इंडियाच्या ४० उड्डाणांना विलंब झाला होता.

मुंबई/नवी दिल्ली : प्रवाशांचे ‘चेक-इन’ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकीय सॉफ्टवेअरमध्ये झालेला बिघाड शनिवारी दुपारपर्यंत दुरुस्त झाला असला तरी त्याचा परिणाम म्हणून रविवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशीही एअर इंडियाच्या जगभरात जाणाऱ्या विमानांना विलंब झाला. मुंबईतील सेवेलाही फटका बसून रविवारी ५० पेक्षा जास्त विमानांना विलंब झाला. शनिवारी एअर इंडियाच्या ४० उड्डाणांना विलंब झाला होता.

शनिवारप्रमाणेच रविवारीही विविध विमानतळांवर प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. विमान नेमके केव्हा सुटेलयाची नक्की माहिती नसल्याने तासन्तास ताटकळत बसावे लागले. अनेकांची पुढच्या प्रवासाची विमाने चुकल्याने त्यांना वेळ आणि पैसा या दोन्हींचा भुर्दंड पडला. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एका मार्गावर गेलेले विमान परत आले की ते दुसºया मार्गावर उड्डाण करते. शनिवारी विमानांना जाताना व परत येतानाही विलंब झाल्याने साहजिकच या विमानांची रविवारची उड्डाणेही उशिराने झाली.

प्रवासीही हैराण

शनिवारी एकूण १४९ विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला होता. परिणामी रविवारी १३७ उड्डाणे उशिराने झाली. रविवारच्या उड्डाणांचा सरासरी विलंब तीन तासांहून अधिक होता.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया