शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एअर इंडियासह तीन कंपन्यांच्या खासगीकरणाला होणार विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 07:06 IST

मार्चनंतरच शक्य; दीड लाख कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न

मुंबई : केंद्र सरकारने एअर इंडिया, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) व कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (कॉनकॉर) या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे ठरविले असले तरी ते या आर्थिक वर्षात, मार्चपर्यंत होण्याची अजिबात शक्यता नाही.या कंपन्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया मार्चनंतर सुरू होईल. वरिष्ठ अधिकारी म्हणाला की, आम्ही खासगीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. ती पूर्ण होण्यास काही काळ नक्कीच लागेल. या विक्रीसाठी संबंधित कंपन्यांकडून इरादापत्रे येणे, त्यानंतर किमतीबद्दल वाटाघाटी आणि त्यानंतर अंतिम निर्णय, हे तीन महिन्यांत पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळेच या प्रक्रियेला विलंब होईल, असे दिसते. सरकारने एअर इंडियातील आपला १00 टक्के हिस्सा विकण्याचे ठरविले आहे. बीपीसीएलमधील ५३.२९ टक्के तर कॉनकॉरमधील ३0.८ टक्के विकण्याचा निर्णय घेतला आहे. कॉनकॉरमधील केंद्र सरकारचा हिस्सा सध्या ५४.८ टक्के इतका आहे. निर्गुंतवणुकीतून दीड लाख कोटी रुपये उभारण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. मात्र आतापर्यंत १७ हजार ३६४ कोटी रुपयेच मिळू शकले आहेत.तूट भरून कशी काढणार?उद्योग जगताला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट करामध्ये कपात केली. या निर्णयाने महसुलामध्ये आणखी घट होणार असून, ही तूट कशी भरून काढायची, हा केंद्र सरकारपुढील पेच आहे. निर्गुंतवणुकीतून मोठा निधी उभारून ही दरी भरून काढायचा सरकारचा मानस आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया