शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'काँग्रेस अध्यक्षाच्या निवडीस विलंब अयोग्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 01:50 IST

पक्षाच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षाच्या निवडीस अजून विलंब लावणे हा पर्याय होऊ शकत नाही, असे त्या पक्षाचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणी व महत्त्वाच्या नेत्यांची उद्या, शनिवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार असून, त्या पार्श्वभूमीवर सिंघवी यांनी हे मत व्यक्त केले आहे.लोकसभा निवडणुकांत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी २५ मे रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचे मन वळविण्याचे काँग्रेसमधील नेते, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मात्र राजीनामा मागे न घेण्याच्या विचारावर राहुल गांधी ठाम आहेत. त्यामुळे दोन महिन्यांहून अधिक काळ काँग्रेस पक्ष अध्यक्षाविनाच आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अध्यक्ष व्हावे यासाठी त्यांची मनधरणी पक्षनेत्यांनी केली. मात्र अध्यक्षपदासाठी आपले नाव चर्चेत आणल्याबद्दल प्रियांका गांधी यांनी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत हंगामी पक्षाध्यक्षाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे की, कार्यकारिणीने पक्षाध्यक्षाची लवकरात लवकर निवड करावी. त्यामध्ये विलंब होऊ नये.कोण होईल नवा अध्यक्ष?पक्षाध्यक्षच नसणे हे काँग्रेससाठी हानिकारक ठरू शकते, अशी भावना आतापर्यंत काही काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. पक्षाचा पुढचा अध्यक्ष गांधी घराण्यातील नसावा, अशी इच्छाही राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षाध्यक्ष निवडताना काँग्रेस कार्यकारिणीला बरेच विचारमंथनही करावे लागणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस