शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सैन्य दल सतर्क, देण्यात आल्यायेत 'अशा' प्रकारच्या सूचना; राजनाथ सिंह म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 16:48 IST

भारतात वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरससंदर्भात राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे अदृश्य युद्ध आहे. असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देदेशात आतापर्यंत 15,712हून अधिक जणांना कोरोनाची लागणराजनाथ सिंह म्हणाले, कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे अदृश्य युद्धदेशात गेल्या 24 तासांत 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही तो हातपाय पसरू लागला आहे. देशात आतापर्यंत 15,712हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून 500हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता सैन्य दलातील सर्व जवानांना आणि कर्मचाऱ्यांना रोजच्या रोज संपर्क डायरी अपडेट ठेवण्यास सांगण्यात आले आहे. एवढेच नाही, तर त्यांचे सर्वप्रकारचे सामूहिक प्रशिक्षण कार्यक्रमही थांबवण्यात आले असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली.

भारतात वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरससंदर्भात राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे अदृश्य युद्ध आहे. असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. देशात गेल्या 24 तासांत 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 1334 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

युद्ध स्थरावर सुरू आहे कोरोनाचा सामना -राजनाथ सिंह म्हणाले, भारत युद्ध स्थरावर कोरोनाचा सामना करत आहे. यासाठी सर्व सरकारी संस्था समन्वयाने काम करत आहेत. संवाद तत्र, पुरवठा साखळी व्यवस्थापन, वैद्यकीय सहाय्य आणि अभियांत्रिकी यात शस्त्र दलाचाही वापर केला जात आहे.

सौन्य दल सतर्क -सैन्य दलातील कोरोना संसर्गासंदर्भात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, सैन्य दलातील कर्मचाऱ्यांना संपर्क डायरी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सर्वप्रकारचे सामूहिक कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत. याशिवाय युद्धनौका आणि पाणबुड्या, जथे सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अवघड आहे, तेथे इतर सर्वप्रकारची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभागGovernmentसरकारIndiaभारत