शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 14:16 IST

'पाकिस्तानात सध्या स्थिती वाईट आहे, त्यामुळे पीओकेत भारतात सामील होण्याची मागणी होत आहे.'

Rajnath Singh on PoK: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता सोमवारी(दि.26) त्यांनी पाकव्याप्त काश्मीर (POK) संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. जम्मूमध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एका परिषदेत बोलताना ते म्हणाले की, 'आता पीओके भारतात विलीन करण्याची मागणी होत आहे, तिथे आम्हाला फार काही करण्याची गरज नाही.' यावेळी संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानवर दहशतवादाच्या मुद्द्यावरुन टीकाही केली. 

पीओकेबाबतराजनाथ सिंह म्हणाले की, तेथील लोक सतत भारतात सामील होण्याची मागणी करत आहेत, अशा परिस्थितीत आम्हाला फार काही करण्याची गरज नाही. जम्मूमध्ये बोलताना संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तान आणि चीनबाबत वक्तव्य केले. आमच्या सैन्याने एलएसीवर चीनला चोख प्रत्युत्तर दिल्याचे ते म्हणाले.पाकिस्तानच्या भूमीवरून पसरलेल्या दहशतवादाबद्दल राजनाथ सिंह म्हणाले की, 2019 मध्ये पुलवामा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान मोदींनी दहा मिनिटांत कारवाईचा निर्णय घेतला. 

भारतीय लष्कराने सीमेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला. गरज पडल्यास सीमेपलीकडे जाऊनही भारत शत्रूंचा नायनाट करू शकतो, असे राजनाथ यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपासून पाकिस्तानची स्थिती चांगली नाही, राजकीय आघाडीवर पाकिस्तानची स्थिती अतिशय वाईट आहे. पीओकेमध्ये वेळोवेळी पाकिस्तानी राजवटीच्या विरोधात निदर्शने होत असतात. यामुळेच भारत सरकार पीओकेच्यावर लक्ष ठेवून आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानPOK - pak occupied kashmirपीओकेJammu Kashmirजम्मू-काश्मीर