शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 14:16 IST

'पाकिस्तानात सध्या स्थिती वाईट आहे, त्यामुळे पीओकेत भारतात सामील होण्याची मागणी होत आहे.'

Rajnath Singh on PoK: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आता सोमवारी(दि.26) त्यांनी पाकव्याप्त काश्मीर (POK) संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. जम्मूमध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एका परिषदेत बोलताना ते म्हणाले की, 'आता पीओके भारतात विलीन करण्याची मागणी होत आहे, तिथे आम्हाला फार काही करण्याची गरज नाही.' यावेळी संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानवर दहशतवादाच्या मुद्द्यावरुन टीकाही केली. 

पीओकेबाबतराजनाथ सिंह म्हणाले की, तेथील लोक सतत भारतात सामील होण्याची मागणी करत आहेत, अशा परिस्थितीत आम्हाला फार काही करण्याची गरज नाही. जम्मूमध्ये बोलताना संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तान आणि चीनबाबत वक्तव्य केले. आमच्या सैन्याने एलएसीवर चीनला चोख प्रत्युत्तर दिल्याचे ते म्हणाले.पाकिस्तानच्या भूमीवरून पसरलेल्या दहशतवादाबद्दल राजनाथ सिंह म्हणाले की, 2019 मध्ये पुलवामा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान मोदींनी दहा मिनिटांत कारवाईचा निर्णय घेतला. 

भारतीय लष्कराने सीमेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला. गरज पडल्यास सीमेपलीकडे जाऊनही भारत शत्रूंचा नायनाट करू शकतो, असे राजनाथ यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपासून पाकिस्तानची स्थिती चांगली नाही, राजकीय आघाडीवर पाकिस्तानची स्थिती अतिशय वाईट आहे. पीओकेमध्ये वेळोवेळी पाकिस्तानी राजवटीच्या विरोधात निदर्शने होत असतात. यामुळेच भारत सरकार पीओकेच्यावर लक्ष ठेवून आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानPOK - pak occupied kashmirपीओकेJammu Kashmirजम्मू-काश्मीर